शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० गावांची जबाबदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 5:51 PM

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली.

वाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली. उर्वरीत ग्रामपंचायतींची जबाबदारी वर्ग एक ते तीन दर्जाच्या अधिकारी, कर्मचाºयांवर सोपविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी विभाग प्रमुखांना दिल्या.स्वच्छतेसंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, गाव हगणदरीमुक्त करणे, शासकीय व निमशासकीय कार्यालय परिसर स्वच्छ ठेवणे याबरोबरच स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करणे या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना समन्वयातून वर्ग एक ते तीन दर्जाच्या अधिकाºयांवर एक, एक गाव नेमून देण्याची जबाबदारी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभगााने सोपविली आहे. सदर कर्मचाºयांना १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या अभियान कालावधीत संबंधित गावातील उपक्रमांची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान व्यापक करण्यासाठी प्रत्येक गावात ठरवून दिलेले सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत व त्या उपक्रमांचे संनियंत्रण होण्याकरीता वर्ग एक ते तीनच्या अधिकारी, कर्मचाºयांना ग्रामपंचायत नेमून देण्यात आली आहे. जिल्हा परिषद स्तरावरून ७० ग्रामपंचायत स्तरावर ७० नोडल अधिकारी नेमून दिले आहेत. उर्वरीत ग्राम पंचायतींमध्ये नोडल अधिकारी म्हणून अधिकारी, कर्मचाºयांची नेमणूक करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी विभाग प्रमुख तसेच तालुकास्तरीय अधिकाºयांना  दिल्या.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद