ग्रामीण आरोग्य यंत्रणा 'अपडाऊन'च्या आजाराने ग्रस्त
By Admin | Updated: May 25, 2014 00:08 IST2014-05-24T22:16:43+5:302014-05-25T00:08:36+5:30
वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना आरेाग्य सुविधांचा खर्या अर्थाने लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे.

ग्रामीण आरोग्य यंत्रणा 'अपडाऊन'च्या आजाराने ग्रस्त
वाशिम: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यांच्या रक्षणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते उपकेंद्रांपर्यंत आरोग्य खात्याने जिल्हयात ग्रामीण भागात मोठया प्रमाणात कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.परंतु, बहुतांश कर्मचारी मुख्यायली न राहता शहरातून अपडाऊन करीत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा खर्या अर्थाने लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे. जिल्हयात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १५३ आरोग्य उपकेंद्रे, नऊ आयुर्वेदीक दवाखाने, एक अँलोपॅथीक दवाखाना, फिरत वैद्यकीय पथक अशी यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेअंतर्गत जिल्हयात एकूण ४६८ पदे मंजुर आहेत. तथापी, या मंजुर पदांपैकी ४१४ पदेच भरण्यात आलेली आहेत.विशेष बाब म्हणजे या भरलेल्या पदांवरील ४१४ आरोग्य कर्मचार्यांपैकी बहुतांश कर्मचारी त्यांच्या मुख्यालयी न राहता शहरात राहतात आणि तेथून दररोज त्यांच्या डयुटीच्या गावात मिळेल त्या वाहनाने अप-डाऊन करतात. मोजकेच कर्मचारी मुख्यालयाच्या गावात राहतात. अपडाऊनच्या या आजारामुळे ग्रस्त झालेली आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा देण्याबाबत कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे.