शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST

वाशिम : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावाची स्वच्छता अबाधित ठेवण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जि. प. ...

वाशिम : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावाची स्वच्छता अबाधित ठेवण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी २५ सप्टेंबर रोजी केले. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय स्वच्छता संवाद या ऑनलाइन उपक्रमात ते बोलत होते.

जिल्ह्यात २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे ‘स्थायित्व व सुजलाम अभियान’ राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन करण्याकरिता शोषखड्ड्यांची निर्मिती केली जात असून जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी यात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन निकम यांनी केले. या संवाद उपक्रमात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनीही संवाद साधला. ते म्हणाले जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला ५५ लीटर पाणी व प्रत्येक घरी नळ जोडणी देणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता या सोबत होणाऱ्या बाबी असून सरपंचांच्या सकारात्मक सहभागाशिवाय शक्य नाही. ‘स्थायित्व व सुजलाम अभियान’ यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

.........

चर्चेत सरपंचांचादेखील सहभाग!

या चर्चेत सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव), पारवा ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल लुंगे यांच्यासह इतर सरपंचांनी सहभाग घेतला. माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, मूल्यांकन व संनियंत्रण सल्लागार विजय नागे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे यांनी पाणी व स्वच्छतेबाबतच्या विविध विषयांवर प्रकाश टाकला.

मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणाची तांत्रिक बाबीचे संचालन जिल्हा कक्षाचे वित्त व संपादणूक सल्लागार सुमेर चाणेकर यांनी केले. सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र सोनोने यांनी आभार मानले.