शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST

वाशिम : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावाची स्वच्छता अबाधित ठेवण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जि. प. ...

वाशिम : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावाची स्वच्छता अबाधित ठेवण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी २५ सप्टेंबर रोजी केले. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय स्वच्छता संवाद या ऑनलाइन उपक्रमात ते बोलत होते.

जिल्ह्यात २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे ‘स्थायित्व व सुजलाम अभियान’ राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन करण्याकरिता शोषखड्ड्यांची निर्मिती केली जात असून जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी यात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन निकम यांनी केले. या संवाद उपक्रमात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनीही संवाद साधला. ते म्हणाले जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला ५५ लीटर पाणी व प्रत्येक घरी नळ जोडणी देणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता या सोबत होणाऱ्या बाबी असून सरपंचांच्या सकारात्मक सहभागाशिवाय शक्य नाही. ‘स्थायित्व व सुजलाम अभियान’ यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

.........

चर्चेत सरपंचांचादेखील सहभाग!

या चर्चेत सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव), पारवा ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल लुंगे यांच्यासह इतर सरपंचांनी सहभाग घेतला. माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, मूल्यांकन व संनियंत्रण सल्लागार विजय नागे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे यांनी पाणी व स्वच्छतेबाबतच्या विविध विषयांवर प्रकाश टाकला.

मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणाची तांत्रिक बाबीचे संचालन जिल्हा कक्षाचे वित्त व संपादणूक सल्लागार सुमेर चाणेकर यांनी केले. सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र सोनोने यांनी आभार मानले.