शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पूर्णा नदीवर रास्तारोको, लोणीत मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:40 IST

सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजीत बंदला संग्रामपुर तालुक्यात बंदला सर्वधर्मीय पाठिंबा मिळाला. तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्तारोको करण्यात आला.

संग्रामपूर(वाशिम) : सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजीत बंदला संग्रामपुर तालुक्यात बंदला सर्वधर्मीय पाठिंबा मिळाला. तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्तारोको करण्यात आला. यावेळी काही युवकांनी टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवला. तर आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. लोणी येथे आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली होती.

संग्रामपुर तालुक्यातील चांगेफळ निवाणा, संग्रामपुर, वरवट बकाल, पातुडार, मनार्डी, खिरोडा फाटा, एकलारा, बावनबिर, टुनकी, सोनाळा सह संपूर्ण तालुक्यात दुकाने ठेवण्यात आली होती. सकल मराठा समाजासह तालुक्यातील सर्वधर्मीय नेत्यांनी मोठ्यासंख्येने सहभाग दर्शवित बंद पाळण्याचे आवाहन केले. 

लोणी :मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी बंद पुकारण्यात आला. या बंददरम्यान रिसोड तालुक्यातील लोणी बु. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक पे्रतयात्रा काढून दहनविधीही करण्यात आला. या अभिनव आंदोलनात सर्वधर्मियांनी सहभाग नोंदविला होता

पूर्णा नदीवर रास्तारोको :वरवट बकाल संग्रामपुर रस्त्यावर व खिरोडा पुर्णा नदीच्या पुलावर टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. बंद दरम्यान सर्व बाजारपेठा, प्रतिष्ठाने कडकडीत बंद होत्या. सकल मराठा समाज आज रस्त्यावर दिसुन आला. समाजातर्फे काळयाफिती लावून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. तालुक्यात सर्वत्र रस्ता रोको करण्यात आल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. शाळा महाविद्यालयेही बंद होती. 

प्रत्येक बसथांब्यावर पोलीस तैनात :या बंददरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कोलमडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. एसटीची प्रवासी वाहतूक बंद राहिली तरी, खासगी वाहतूक सुरळीत राहावी म्हणून जिल्ह्यातील सर्वच मुख्य मार्गावरील प्रत्येक थांब्यावर पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने गुरुवारी राज्यात पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळला. संपूर्ण जिल्ह्यात सकाळपासूनच बंदचे वातावरण तयार झाले होते. नागरिकांनी स्वेच्छेनेच आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली. शाळा महाविद्यालयांना संस्थाचालकांनी सुरक्षिततेची बाब लक्षात घेत, सुटी दिली. दरम्यान, दुपारपर्यंत रस्त्यांवर कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा