शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

वाशीम जिल्ह्यातील बॅरेजेसमध्ये मुबलक जलसाठा; पण पाणी केले आरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 09:24 IST

जिल्ह्यातील बॅरेजेसमध्ये मुबलक लसाठा आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न ऐरणीवर: शेतकरी हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून जिल्हयातील पैनगंगा नदीवर जलसंपदा विभागाने ११ ठिकाणी बॅरेजेस उभे केले. त्यात यंदाच्या पावसाळ्यानंतर १०० टक्के पाणीसाठा झाला. आताही ५० टक्क्याच्या आसपास जलसाठा आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.पैनगंगा नदीवर वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी प्रथम प्राधान्याने बॅरेजेसची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. इतर ठिकाणचे सिंचन प्रकल्प, गावतलावांची पाणीपातळी झपाट्याने खालावली असताना या बॅरेजेसमध्ये मात्र पुरेसा जलसाठा आहे. त्याचा वापर उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण्याकरिता करण्याचे प्रशासनाने निश्चित केले असून बॅरेजेसमधून सिंचनासाठी थेंबभरही पाणी वापरू नये, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाचे उल्लंघन करणाºयाविरूद्ध धडक कारवाई करण्याचा फतवाही प्रशासनाने जाहीर केला आहे. यामुळे सिंचन होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंग पावले असून, रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी थोडेफार तरी पाणी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Damधरण