शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

वाशीम जिल्ह्यातील बॅरेजेसमध्ये मुबलक जलसाठा; पण पाणी केले आरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 09:24 IST

जिल्ह्यातील बॅरेजेसमध्ये मुबलक लसाठा आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न ऐरणीवर: शेतकरी हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून जिल्हयातील पैनगंगा नदीवर जलसंपदा विभागाने ११ ठिकाणी बॅरेजेस उभे केले. त्यात यंदाच्या पावसाळ्यानंतर १०० टक्के पाणीसाठा झाला. आताही ५० टक्क्याच्या आसपास जलसाठा आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.पैनगंगा नदीवर वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी प्रथम प्राधान्याने बॅरेजेसची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. इतर ठिकाणचे सिंचन प्रकल्प, गावतलावांची पाणीपातळी झपाट्याने खालावली असताना या बॅरेजेसमध्ये मात्र पुरेसा जलसाठा आहे. त्याचा वापर उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण्याकरिता करण्याचे प्रशासनाने निश्चित केले असून बॅरेजेसमधून सिंचनासाठी थेंबभरही पाणी वापरू नये, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाचे उल्लंघन करणाºयाविरूद्ध धडक कारवाई करण्याचा फतवाही प्रशासनाने जाहीर केला आहे. यामुळे सिंचन होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंग पावले असून, रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी थोडेफार तरी पाणी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Damधरण