शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शिष्यवृत्ती खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी होणार पुनर्पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 15:03 IST

अनियमिततेची चौकशी पूर्ण; सनदी लेखापालांची नियुक्ती केली जाणार

वाशिम : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क या योजनेत झालेल्या अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली आहे. दरम्यान, आता खर्चाचा ताळमेळ बसवला जाणार असून पुर्नपडताळणी करण्यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.शिष्यवृत्ती योजनेतील अनियमिततेसंबंधी चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकाने चौकशी करून अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे १ जानेवारी २०१० ते ३१ मार्च २०१७ पर्यंतचे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यासह इतर योजनांमधून झालेल्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यात येणार आहे. ही तपासणी सनदी लेखापालांमार्फत करण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाला देण्यात आले आहे.शिष्यवृत्ती आणि शुल्क विषयक योजनांच्या आर्थिक बाबीचे समायोजन, ताळमेळ आणि इतर बाबींची तपासणी सनदी लेखापालांकडून एक महिन्याच्या आत करुन तसा सविस्तर अहवाल समाज कल्याण आयुक्तालयास सादर करावयाचा आहे. या अनुषंगाने खर्चाचा ताळमेळ करून घेण्यासाठी पुर्नपडताळणी केली जाणार असून जिल्ह्यातील सनदी लेखापालांकडून ७ डिसेंबरपर्यंत दरपत्रके मागवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीEducationशिक्षण