शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने झोडपले, सोयाबीनने तारले अन् आता बाजारभावाने मारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST

वाशिम : यंदाही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला असून, या आपत्तीतून बचावलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येत आहे. सोयाबीनचा ...

वाशिम : यंदाही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला असून, या आपत्तीतून बचावलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येत आहे. सोयाबीनचा एकरी उतारही (उत्पादन) बऱ्यापैकी आहे. मात्र, बाजारभावात घसरण सुरूच आहे. शनिवारी ५५००-७२०० असलेला बाजारभाव सोमवार, २० सप्टेंबर रोजी ५०००-६२०० प्रती क्विंटल होता. सुरुवातीला पावसाने झोडपले, त्यानंतर सोयाबीनच्या उत्पादनाने तारले आणि आता अल्प बाजारभावाने मारले, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतीत नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. एकीकडे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी, मशागत खर्चात भरमसाठ वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेतमालाच्या किमतीत फारशी वाढ होत नसल्याने आर्थिक ताळमेळ बसविणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. नवीन सोयाबीन घरात येण्यापूर्वी सोयाबीनचे बाजारभाव ११ हजारांवर पोहोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु, नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभावात घसरण सुरू झाली आहे. सोमवार, २० सप्टेंबर रोजी तर बाजारभाव सव्वासहा हजारांवर येऊन ठेपले आहेत. शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या बाजार समितीत सोयाबीनला प्रती क्विंटल ५५००-७२०० भाव मिळाला होता. सोमवारी ५७५०-६२०१ असा दर मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. एका दिवसातच हजार रुपयाने दर कोसळल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसून येते. १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनला फटका बसला. अशा परिस्थितीतही सोयाबीनच्या उत्पादनात फारशी घट आली नाही. एकरी उतार ७ ते १२ क्विंटलदरम्यान येत असल्याने ‘अच्छे दिन’ येतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी अल्प बाजारभावाने निराशा टाकल्याचे दिसून येते. बाजारभावात आणखी घसरण सुरूच राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

.......

लागवड खर्चानुसार बाजारभाव असावा !

एकीकडे लागवड खर्चात भरमसाठ वाढ होत असल्याने शेतीचे ताळतंत्र बिघडू नये म्हणून बाजारभावही समाधानकारक असावा, अशी अपेक्षा पळसखेडा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब खरात, चिखली येथील संजयकुमार सरनाईक, रमेश अंभोरे, नागठाणा येथील महादेव सोळंके, रिठद येथील नारायणराव आरू आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशक, मजुरी, मशागत खर्चात ज्या पटीने वाढ होत आहे, तशाच पद्धतीने शेतमालाच्या दरातही वाढ व्हावी, असा सुर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.