शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने झोडपले, सोयाबीनने तारले अन् आता बाजारभावाने मारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST

वाशिम : यंदाही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला असून, या आपत्तीतून बचावलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येत आहे. सोयाबीनचा ...

वाशिम : यंदाही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला असून, या आपत्तीतून बचावलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येत आहे. सोयाबीनचा एकरी उतारही (उत्पादन) बऱ्यापैकी आहे. मात्र, बाजारभावात घसरण सुरूच आहे. शनिवारी ५५००-७२०० असलेला बाजारभाव सोमवार, २० सप्टेंबर रोजी ५०००-६२०० प्रती क्विंटल होता. सुरुवातीला पावसाने झोडपले, त्यानंतर सोयाबीनच्या उत्पादनाने तारले आणि आता अल्प बाजारभावाने मारले, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतीत नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. एकीकडे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी, मशागत खर्चात भरमसाठ वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेतमालाच्या किमतीत फारशी वाढ होत नसल्याने आर्थिक ताळमेळ बसविणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. नवीन सोयाबीन घरात येण्यापूर्वी सोयाबीनचे बाजारभाव ११ हजारांवर पोहोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु, नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभावात घसरण सुरू झाली आहे. सोमवार, २० सप्टेंबर रोजी तर बाजारभाव सव्वासहा हजारांवर येऊन ठेपले आहेत. शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या बाजार समितीत सोयाबीनला प्रती क्विंटल ५५००-७२०० भाव मिळाला होता. सोमवारी ५७५०-६२०१ असा दर मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. एका दिवसातच हजार रुपयाने दर कोसळल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसून येते. १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनला फटका बसला. अशा परिस्थितीतही सोयाबीनच्या उत्पादनात फारशी घट आली नाही. एकरी उतार ७ ते १२ क्विंटलदरम्यान येत असल्याने ‘अच्छे दिन’ येतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी अल्प बाजारभावाने निराशा टाकल्याचे दिसून येते. बाजारभावात आणखी घसरण सुरूच राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

.......

लागवड खर्चानुसार बाजारभाव असावा !

एकीकडे लागवड खर्चात भरमसाठ वाढ होत असल्याने शेतीचे ताळतंत्र बिघडू नये म्हणून बाजारभावही समाधानकारक असावा, अशी अपेक्षा पळसखेडा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब खरात, चिखली येथील संजयकुमार सरनाईक, रमेश अंभोरे, नागठाणा येथील महादेव सोळंके, रिठद येथील नारायणराव आरू आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशक, मजुरी, मशागत खर्चात ज्या पटीने वाढ होत आहे, तशाच पद्धतीने शेतमालाच्या दरातही वाढ व्हावी, असा सुर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.