शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

पावसाने झोडपले, सोयाबीनने तारले अन् आता बाजारभावाने मारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST

वाशिम : यंदाही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला असून, या आपत्तीतून बचावलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येत आहे. सोयाबीनचा ...

वाशिम : यंदाही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला असून, या आपत्तीतून बचावलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येत आहे. सोयाबीनचा एकरी उतारही (उत्पादन) बऱ्यापैकी आहे. मात्र, बाजारभावात घसरण सुरूच आहे. शनिवारी ५५००-७२०० असलेला बाजारभाव सोमवार, २० सप्टेंबर रोजी ५०००-६२०० प्रती क्विंटल होता. सुरुवातीला पावसाने झोडपले, त्यानंतर सोयाबीनच्या उत्पादनाने तारले आणि आता अल्प बाजारभावाने मारले, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतीत नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. एकीकडे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी, मशागत खर्चात भरमसाठ वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेतमालाच्या किमतीत फारशी वाढ होत नसल्याने आर्थिक ताळमेळ बसविणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. नवीन सोयाबीन घरात येण्यापूर्वी सोयाबीनचे बाजारभाव ११ हजारांवर पोहोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु, नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभावात घसरण सुरू झाली आहे. सोमवार, २० सप्टेंबर रोजी तर बाजारभाव सव्वासहा हजारांवर येऊन ठेपले आहेत. शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या बाजार समितीत सोयाबीनला प्रती क्विंटल ५५००-७२०० भाव मिळाला होता. सोमवारी ५७५०-६२०१ असा दर मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. एका दिवसातच हजार रुपयाने दर कोसळल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसून येते. १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनला फटका बसला. अशा परिस्थितीतही सोयाबीनच्या उत्पादनात फारशी घट आली नाही. एकरी उतार ७ ते १२ क्विंटलदरम्यान येत असल्याने ‘अच्छे दिन’ येतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी अल्प बाजारभावाने निराशा टाकल्याचे दिसून येते. बाजारभावात आणखी घसरण सुरूच राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

.......

लागवड खर्चानुसार बाजारभाव असावा !

एकीकडे लागवड खर्चात भरमसाठ वाढ होत असल्याने शेतीचे ताळतंत्र बिघडू नये म्हणून बाजारभावही समाधानकारक असावा, अशी अपेक्षा पळसखेडा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब खरात, चिखली येथील संजयकुमार सरनाईक, रमेश अंभोरे, नागठाणा येथील महादेव सोळंके, रिठद येथील नारायणराव आरू आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशक, मजुरी, मशागत खर्चात ज्या पटीने वाढ होत आहे, तशाच पद्धतीने शेतमालाच्या दरातही वाढ व्हावी, असा सुर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.