शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

दहा दिवसांपासून पावसाची दडी : पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 15:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ  फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी माना खाली टाकल्यामुळे  नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभाला निसर्गाने साथ दिल्यावर ...

ठळक मुद्देदहा दिवसापासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने हिरवीगार बहरणारी माळरानावर संकट सापडण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत .ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे ते स्पिकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न करित आहे . येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास हातचे पीक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ  फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी माना खाली टाकल्यामुळे  नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभाला निसर्गाने साथ दिल्यावर परिसरातील शेतकरी आनंदीत होता . पेरण्या योग्यवेळी अडथळाविना पार पडल्या त्यानंतर मात्र पावसाची रिपरिप सुरु झाल्याने काही प्रमाणात जास्त पाण्यामुळे तुरीच्या पिकांना फटका बसला, मात्र गेल्या  दहा दिवसापासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने हिरवीगार बहरणारी माळरानावर संकट सापडण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत . ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे ते स्पिकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न करित आहे .       ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही त्यांच्यासाठी थांबलेला पाऊस धोकादायक ठरत आहेत.  जुलै महिन्यात सतत ८ दिवस पावसाची रिपरिप सुरु होती, त्या समाधानकारक पावसावर परिसरातील शेतकºयांची पिके थोडी बहरली . उघडीप मिळाल्यावर महागडी किटकनाशक औषधी घेवून मोठ्या प्रमाणावर फवारण्या केल्या त्या निरर्थक ठरत आहेत.परिसरात खरीप हंगामावर शेतकºयांची भिस्त आहे.  मागील तीन चार वषार्पासून सोनल प्रकल्पात १०० टक्के जलसाठा होत नसल्याने आवश्यक त्या प्रमाणात रब्बी पिकांचा लाभ घेण्यापासुन शेतकºयांना वंचीत रहावे लागत आहे .  येत्या आठ दिवसांत परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही तर हलक्या जमीनीवरील पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.   अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी पावसाने सलग ८ ते १० दिवसापासून उघडीप दिल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट बनली आहे.पावसासाठी शेतकरी देवाकडे साकडे घालतांना दिसून येत आहे. येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास शेतकºयांचे हातचे पीक जाण्याची  शक्यता नाकारता येत नाही.तुषार सिंचनाचा आधारगत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून पावसाची प्रतिक्षा करीत आहे. तर ज्या शेतकºयाकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते शेतकरी आपले पिक वाचविण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घेतांना दिसून येत आहे. परंतु ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्थाच नाही अश्या शेतकºयांच्या हातचे पीके जाण्याची शक्यता दिसून येत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस