शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दहा दिवसांपासून पावसाची दडी : पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 15:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ  फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी माना खाली टाकल्यामुळे  नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभाला निसर्गाने साथ दिल्यावर ...

ठळक मुद्देदहा दिवसापासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने हिरवीगार बहरणारी माळरानावर संकट सापडण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत .ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे ते स्पिकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न करित आहे . येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास हातचे पीक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ  फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी माना खाली टाकल्यामुळे  नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभाला निसर्गाने साथ दिल्यावर परिसरातील शेतकरी आनंदीत होता . पेरण्या योग्यवेळी अडथळाविना पार पडल्या त्यानंतर मात्र पावसाची रिपरिप सुरु झाल्याने काही प्रमाणात जास्त पाण्यामुळे तुरीच्या पिकांना फटका बसला, मात्र गेल्या  दहा दिवसापासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने हिरवीगार बहरणारी माळरानावर संकट सापडण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत . ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे ते स्पिकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न करित आहे .       ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही त्यांच्यासाठी थांबलेला पाऊस धोकादायक ठरत आहेत.  जुलै महिन्यात सतत ८ दिवस पावसाची रिपरिप सुरु होती, त्या समाधानकारक पावसावर परिसरातील शेतकºयांची पिके थोडी बहरली . उघडीप मिळाल्यावर महागडी किटकनाशक औषधी घेवून मोठ्या प्रमाणावर फवारण्या केल्या त्या निरर्थक ठरत आहेत.परिसरात खरीप हंगामावर शेतकºयांची भिस्त आहे.  मागील तीन चार वषार्पासून सोनल प्रकल्पात १०० टक्के जलसाठा होत नसल्याने आवश्यक त्या प्रमाणात रब्बी पिकांचा लाभ घेण्यापासुन शेतकºयांना वंचीत रहावे लागत आहे .  येत्या आठ दिवसांत परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही तर हलक्या जमीनीवरील पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.   अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी पावसाने सलग ८ ते १० दिवसापासून उघडीप दिल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट बनली आहे.पावसासाठी शेतकरी देवाकडे साकडे घालतांना दिसून येत आहे. येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास शेतकºयांचे हातचे पीक जाण्याची  शक्यता नाकारता येत नाही.तुषार सिंचनाचा आधारगत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून पावसाची प्रतिक्षा करीत आहे. तर ज्या शेतकºयाकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते शेतकरी आपले पिक वाचविण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घेतांना दिसून येत आहे. परंतु ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्थाच नाही अश्या शेतकºयांच्या हातचे पीके जाण्याची शक्यता दिसून येत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस