शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दहा दिवसांपासून पावसाची दडी : पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 15:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ  फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी माना खाली टाकल्यामुळे  नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभाला निसर्गाने साथ दिल्यावर ...

ठळक मुद्देदहा दिवसापासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने हिरवीगार बहरणारी माळरानावर संकट सापडण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत .ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे ते स्पिकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न करित आहे . येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास हातचे पीक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ  फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी माना खाली टाकल्यामुळे  नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभाला निसर्गाने साथ दिल्यावर परिसरातील शेतकरी आनंदीत होता . पेरण्या योग्यवेळी अडथळाविना पार पडल्या त्यानंतर मात्र पावसाची रिपरिप सुरु झाल्याने काही प्रमाणात जास्त पाण्यामुळे तुरीच्या पिकांना फटका बसला, मात्र गेल्या  दहा दिवसापासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने हिरवीगार बहरणारी माळरानावर संकट सापडण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत . ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे ते स्पिकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न करित आहे .       ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही त्यांच्यासाठी थांबलेला पाऊस धोकादायक ठरत आहेत.  जुलै महिन्यात सतत ८ दिवस पावसाची रिपरिप सुरु होती, त्या समाधानकारक पावसावर परिसरातील शेतकºयांची पिके थोडी बहरली . उघडीप मिळाल्यावर महागडी किटकनाशक औषधी घेवून मोठ्या प्रमाणावर फवारण्या केल्या त्या निरर्थक ठरत आहेत.परिसरात खरीप हंगामावर शेतकºयांची भिस्त आहे.  मागील तीन चार वषार्पासून सोनल प्रकल्पात १०० टक्के जलसाठा होत नसल्याने आवश्यक त्या प्रमाणात रब्बी पिकांचा लाभ घेण्यापासुन शेतकºयांना वंचीत रहावे लागत आहे .  येत्या आठ दिवसांत परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही तर हलक्या जमीनीवरील पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.   अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी पावसाने सलग ८ ते १० दिवसापासून उघडीप दिल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट बनली आहे.पावसासाठी शेतकरी देवाकडे साकडे घालतांना दिसून येत आहे. येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास शेतकºयांचे हातचे पीक जाण्याची  शक्यता नाकारता येत नाही.तुषार सिंचनाचा आधारगत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून पावसाची प्रतिक्षा करीत आहे. तर ज्या शेतकºयाकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते शेतकरी आपले पिक वाचविण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घेतांना दिसून येत आहे. परंतु ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्थाच नाही अश्या शेतकºयांच्या हातचे पीके जाण्याची शक्यता दिसून येत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस