शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

‘जलयुक्त शिवार’मुळे अडतेय ठिकठिकाणी पावसाचे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:16 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून कामे झाल्याने कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले. वाशिम जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक गावे जलसमृद्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला.यामुळे विहिरी, कुपनलिका, हातपंप या शाश्वत जलस्त्रोतांच्या पातळीतही वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. याअंतर्गत पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधाºयांची साठवण क्षमता वाढविणे, जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे आदी स्वरूपातील कामे झाल्याने कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता, सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले. यामाध्यमातून वाशिम जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक गावे जलसमृद्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्याची फलनिष्पत्ती आता दिसायला लागली असून जलसंधारणाच्या विविध स्वरूपातील कामांमुळे ठिकठिकाणी पाणी अडविणे शक्य झाले आहे. यामुळे विहिरी, कुपनलिका, हातपंप या शाश्वत जलस्त्रोतांच्या पातळीतही वाढ झाली असून भविष्यात ही बाब सर्वांगाने फायदेशीर राहणार असल्याचा सूर सर्वच स्तरांतून उमटत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणीwashimवाशिम