शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान; भरपाई केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST

वाशिम : जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

वाशिम : जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, नुकसानभरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दरम्यान, यापूर्वीच्या पीक नुकसानाची भरपाई अद्याप मिळाली नसल्याने शासनाकडून भरपाई केव्हा मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच नानाविध संकटांना सामोरे जावे लागते. गतवर्षीदेखील अतिवृष्टीमुळे पीक नुकसानाला सामोरे जावे लागले होते. यंदाही नैसर्गिक आपत्तीसमोर शेतकरी हतबल होत असल्याचे दिसून येत आहे. २१ ते २३ जुलै दरम्यान अतिवृष्टी झाल्याने ३२७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तसेच ४३३ हेक्टर जमीन खरडून गेली. या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नसतानाच, पुन्हा ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान संततधार पावसाने जवळपास ९०० हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. १००पेक्षा अधिक हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे. कृषी व महसूल प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पीककर्जाची परतफेड कशी करावी? या चिंतेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

.........................................

२१ ते २३ जुलै दरम्यान पावसामुळे झालेले नुकसान : ३२७६ हेक्टर

५ ते ७ सप्टेंबर दरम्यान पावसामुळे झालेले नुकसान : ९०० हेक्टर

.........................................

नुकसानभरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

पीक नुकसान, जमीन खरडून जाणे, घरांची पडझड आदी प्रकरणी शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. जुलै महिन्यातील नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठवून दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यातच सप्टेंबर महिन्यातील पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. शासनाकडून भरपाई नेमकी केव्हा मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

...............

कोट बॉक्स

जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान पावसामुळे ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे केले जात आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईसंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविला जाईल.

- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

०००००००००००००

कोट

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला. शासनाने नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. दिरंगाई होत असल्याने शासनही शेतकऱ्यांप्रति संवेदनशील नसल्याचे दिसून येते.

- श्याम बढे, प्रगतशील शेतकरी, रिधोरा