शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कारंजातील बाजारात बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:55 IST

Washim News कारंजातील गुरांच्या बाजारात दमदार बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर पोहोचले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या काही वर्षांपासून यांत्रिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने गाेवंशीय जनावरांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे बैलांना सोन्याचा भाव मिळत असून, कारंजातील गुरांच्या बाजारात दमदार बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर पोहोचले आहेत.शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरल्याने गुरांची संख्या घटली आहे. प्रामुख्याने बैलांचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याने आता बैलांची संख्या घटली आहे. त्यामुळेच बाजारात बैलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा मानल्या जाणाऱ्या कारंजा येथील बाजारात सोमवारी दमदार बैलजोडीला दीड लाखांच्या वरच दर मिळत असल्याचे दिसून आले.  कारंजा येथील गुरांच्या बाजारात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नजीकच्या अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरीही गुरांच्या खरेदीसाठी येतात. त्यामुळे या बाजारात दर सोमवारी लाखोंची उलाढाला केवळ बैलांच्या खरेदी-विक्रीतूनच होत आहे. सोमवारी भरलेल्या गुरांच्या बाजारात एक लाख ४० हजार रुपयांना बैलजोडी विकल्या गेली.

२० लाखांची उलाढालकारंजा येथील गुरांच्या बाजारात वाशिम जिल्ह्यासह अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी गुरांच्या खरेदीसाठी येत असतात. या ठिकाणी गाय, बैल, म्हैस यांच्यासह शेळ्यांची सर्वाधिक खरेदी-विक्री होते. यातून दर आठवड्याला २० लाखांच्यावर उलाढाल होत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यात बैलांसह म्हशीच्या किमती अधिक असल्याने प्रामुख्याने या दोन वर्गातील गुरांच्या खरेदी-विक्रीतूनच अधिक उलाढाल होत आहे. 

बैलजोडीवर दिवसाला १५० रुपये खर्चआधीच चाऱ्याचे दर वाढले असताना बैलांच्या देखभालीसाठी ठेवल्या जाणाऱ्या गड्याची मजुरीही वाढली आहे. त्यामुळे एका बैलजोडीसाठी कडबा, कुटार आणि गड्याच्या मजुरीसह इतर खर्च मिळून शेतकऱ्यांना दीडशे रुपये खर्च येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून चाऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कडबा मिळणे दुरापास्त असून, कुटाराचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बैलांसाठी पुरेसा चारा असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकंदर गुरे पाळणे ही समस्याच झाली आहे.    

 - तुषार भिंगारे, शेतकरी, जानोरी,

 

चाऱ्याचा मोठ्या प्रमाणात असलेला तुटवडा, तसेच गुरांची देखभाल करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. वातावरणातील बदलामुळे वाढत असलेल्या आजारांमुळे गुरे पाळणे आता कठीण होऊन बसले आहे.

-अविनाश भिंगारे, शेतकरी, जानोरी

पूर्वी गुरांचा गोठा नाही, असा शेतकरी मिळणे कठीण होते; परंतु गुरांच्या चाऱ्यासह विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. भाकड जनावरांची समस्याही आता गंभीर झाल्याने गुरे पाळण्याचा विचारही करणे अशक्य आहे.- सुधाकर इंगळे, शेतकरी, इंझोरी 

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिम