शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिवाळीसह रब्बी हंगामाची तयारी; बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 15:39 IST

दिवसाला ३५ हजार क्विंटलच्या वर आवक : दरात किंचित सुधारणा

नंदकिशाेर नारे

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीनची काढणी आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. दिवाळी आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर अनेक शेतकरी सोयाबीनची विक्रीही करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरातही किंचित सुधारणा झाली असली, तरी अपेक्षेच्या तुलनेत सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने शेतकरी निराश आहेत.

जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय आहे. यंदा ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे. या पिकावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून आहे. आता सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, दिवाळीचा सणही तोंडावर आला आहे. या सणासह रब्बीची तयारी आणि घेण्यादेण्याचे व्यवहार करण्यासाठी अनेक शेतकरी काढलेले सोयाबीन विकण्यावर भर देत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव आणि मानोरा या सहा प्रमुख बाजार समित्यांसह शेलू बाजार, अनसिंग, शिरपूर येथील उपबाजारात सोयाबीनची विक्रमी आवक आहे.

कारंजात गुरुवारी ९ हजार क्विंटल

शेतकरी दिवाळीचा सण आणि रब्बी हंगामाच्या तयारीसाठी सोयाबीन विकण्यावर भर देत असल्याने बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत आहे. प्रामुख्याने कारंजा आणि वाशिम बाजार समितीत सोयाबीनची अधिक आवक होत आहे. कारंजा बाजार समितीत गुरुवारी तब्बल ९ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

दर आणखी वाढण्याची शक्यता

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांचाही सोयाबीन खरेदीवर जोर असल्याने सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा दिसत आहे. सोयाबीनला असलेली मागणी पाहता येत्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी