शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

वीजपुरवठा अनियमित; सिंचन क्षेत्र प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:55 IST

रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात व सलग वीजपुरवठा मिळत नसल्याने सिंचन क्षेत्र प्रभावित होत आहे. जादा वीज भारनियमन, तांत्रिक बिघाड आदींमुळे शेतकरी वैतागले आहेत.यावर्षी शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी हंगामावर खिळल्या आहेत. रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. सिंचनाची सुविधा असणाºया बहुतांश शेतकºयांनी गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली आहे. या पिकांना सिंचन करण्यासाठी सलग तसेच पुरेशा दाबात वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. कमी-अधिक विद्युत दाब होत असल्याने मोटारपंप जळण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. अनसिंग सर्कलमधील अनेक शेतकºयांना कोटेशनचा भरणा करूनही कृषीपंप जोडणी मिळाली नाही तसेच काही शेतकºयांनी मागणी करूनही नवीन विद्युत रोहीत्र मिळाले नाही. रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. केनवड उपकेंद्रातील पाच पेक्षा अधिक विद्युत रोहित्र बंद अवस्थेत असल्याने शेतकºयांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी कळंबेश्वरचे सरपंच प्रदीप पाटील मोरे यांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याकडे केली होती. यावर अद्यापही ठोस तोडगा निघाला नाही. रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातही जादा भारनियमन, तांत्रिक बिघाड आदींमुळे सिंचन करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे प्रकल्प, नदी, बॅरेज, विहिरी, शेततळ्यात पाणी असूनही सिंचन करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात तीन मध्यम आणि १३३ लघू प्रकल्प व बंधारे मिळून १३६ प्रकल्प आहेत. यामधून सिंचन करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. याशिवास विहिरी, शेततळे याच्या माध्यमातून सिंचन करता येते. परंतू, अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचन प्रभावित होत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेतीFarmerशेतकरी