शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वीजपुरवठा अनियमित; सिंचन क्षेत्र प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:55 IST

रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात व सलग वीजपुरवठा मिळत नसल्याने सिंचन क्षेत्र प्रभावित होत आहे. जादा वीज भारनियमन, तांत्रिक बिघाड आदींमुळे शेतकरी वैतागले आहेत.यावर्षी शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी हंगामावर खिळल्या आहेत. रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. सिंचनाची सुविधा असणाºया बहुतांश शेतकºयांनी गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली आहे. या पिकांना सिंचन करण्यासाठी सलग तसेच पुरेशा दाबात वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. कमी-अधिक विद्युत दाब होत असल्याने मोटारपंप जळण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. अनसिंग सर्कलमधील अनेक शेतकºयांना कोटेशनचा भरणा करूनही कृषीपंप जोडणी मिळाली नाही तसेच काही शेतकºयांनी मागणी करूनही नवीन विद्युत रोहीत्र मिळाले नाही. रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. केनवड उपकेंद्रातील पाच पेक्षा अधिक विद्युत रोहित्र बंद अवस्थेत असल्याने शेतकºयांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी कळंबेश्वरचे सरपंच प्रदीप पाटील मोरे यांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याकडे केली होती. यावर अद्यापही ठोस तोडगा निघाला नाही. रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातही जादा भारनियमन, तांत्रिक बिघाड आदींमुळे सिंचन करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे प्रकल्प, नदी, बॅरेज, विहिरी, शेततळ्यात पाणी असूनही सिंचन करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात तीन मध्यम आणि १३३ लघू प्रकल्प व बंधारे मिळून १३६ प्रकल्प आहेत. यामधून सिंचन करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. याशिवास विहिरी, शेततळे याच्या माध्यमातून सिंचन करता येते. परंतू, अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचन प्रभावित होत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेतीFarmerशेतकरी