शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

वीजपुरवठा अनियमित; सिंचन क्षेत्र प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:55 IST

रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात व सलग वीजपुरवठा मिळत नसल्याने सिंचन क्षेत्र प्रभावित होत आहे. जादा वीज भारनियमन, तांत्रिक बिघाड आदींमुळे शेतकरी वैतागले आहेत.यावर्षी शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी हंगामावर खिळल्या आहेत. रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. सिंचनाची सुविधा असणाºया बहुतांश शेतकºयांनी गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली आहे. या पिकांना सिंचन करण्यासाठी सलग तसेच पुरेशा दाबात वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. कमी-अधिक विद्युत दाब होत असल्याने मोटारपंप जळण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. अनसिंग सर्कलमधील अनेक शेतकºयांना कोटेशनचा भरणा करूनही कृषीपंप जोडणी मिळाली नाही तसेच काही शेतकºयांनी मागणी करूनही नवीन विद्युत रोहीत्र मिळाले नाही. रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. केनवड उपकेंद्रातील पाच पेक्षा अधिक विद्युत रोहित्र बंद अवस्थेत असल्याने शेतकºयांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी कळंबेश्वरचे सरपंच प्रदीप पाटील मोरे यांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याकडे केली होती. यावर अद्यापही ठोस तोडगा निघाला नाही. रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातही जादा भारनियमन, तांत्रिक बिघाड आदींमुळे सिंचन करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे प्रकल्प, नदी, बॅरेज, विहिरी, शेततळ्यात पाणी असूनही सिंचन करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात तीन मध्यम आणि १३३ लघू प्रकल्प व बंधारे मिळून १३६ प्रकल्प आहेत. यामधून सिंचन करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. याशिवास विहिरी, शेततळे याच्या माध्यमातून सिंचन करता येते. परंतू, अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचन प्रभावित होत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेतीFarmerशेतकरी