शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

गृह विलगीकारणाचे आदेश न पाळणाऱ्यांवर पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:05 AM

या संदर्भात संबंधितांना पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत लेखी नोटीस बजावली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महानगरातून परत आलेल्या नागरिकांनी पुढील १५ दिवस गृह अलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहावे, कुटुंबातील व्यक्ती, गावातील नागरिकांशी संपर्क टाळावा आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ३१ मार्च रोजी दिले.या संदर्भात संबंधितांना पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत लेखी नोटीस बजावली जाणार आहे. तसेच या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही पॉझिटिव्ह अथवा संशयित रुग्ण आढळलेला नाही.जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, तत्पूर्वी मुंबई, पुणे यासह विविध शहरात, जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले नागरिक, विद्यार्थी आपल्या गावी परतले आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण नसला तरी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या एखाद्या व्यक्तीपासून या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही दिवस खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारीसंचारबंदी, लॉकडाऊनमुळे मुंबई, पुणेसह इतर महानगरातून नागरिक, विद्यार्थी जिल्ह्यात परतले आहेत. या सर्व नागरिकांनी १५ दिवस कुटुंबातील तसेच गावातील इतर व्यक्तींच्या संपर्कात न येता घरातच वेगळे राहणे आवश्यक आहे. परंतू अनेक नागरिक व विद्यार्थी हे घरात न राहता गावात फिरत आहेत. अशा सर्व नागरिकांची माहिती पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत घेतली जात आहे. ही माहिती तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाकडे सादर केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम