शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

पैनगंगा नदीचे खोलीकरण, रूंदीकरण रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 5:48 PM

या नदीमधून आजपर्यंत कधीही गाळ काढलेला नाही तसेच नदी  काठावरील दोन्ही बाजुने वाढलेली झाडे, झुडपांची तोड केली नाही. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यातून वाहणाºया पैनगंगा नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण अद्याप झाले नसल्याने, यासंदर्भात शेतकºयांसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी १३ मे रोजी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली. या नदीपात्राचे रूंदीकरण व खोलीकरण झाल्यास शेतकºयांना याचा निश्चितच फायदा होईल, ही बाबही पटवून देण्यात आली.रिसोड तालुका हा महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट असून मागील १० ते १५ वर्षांपासून रिसोड तालुक्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वीच रिसोड तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षीदेखील रिसोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. कमी पर्जन्यमानाचा विपरित परिणाम कृषीक्षेत्रावरही जाणवतो. सध्याच्या स्थितीत मनुष्यासह, जनावरे व शेतीसाठीही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.रिसोड तालुक्यामधून वाहणारी व रिसोडची जीवनवाहीनी समजल्या जाणारी पैनगंगा नदी ही अनेक गावांची तहान भागविण्याबरोबरच शेकडो शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकारत आहेत. मात्र, या नदीमधून आजपर्यंत कधीही गाळ काढलेला नाही तसेच नदी  काठावरील दोन्ही बाजुने वाढलेली झाडे, झुडपांची तोड केली नाही. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजुची झाडे, झुडपे काढल्यास रुंदीकरण होऊ शकते तसेच या नदीमधुन गाळ काढला तर येत्या पावसाळ्यात नदीत मुबलक पाणीसाठा राहू शकेल, ही बाब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निदर्शनात आणून दिली. नदीमधील गाळाचा उपसा केला तर हा गाळ आजुबाजुच्या शेतात टाकून शेतजमीन सुपीकही करता येवू शकते. सदर काम हे शासनाच्या पाटबंधारे विभाग, जलसंधारण किंवा भारतीय जैन संघटना आणि शासनाच्या संयुक्तपणे करावे, अशी मागणी ठाकूर यांच्यासह शेतकºयांनी  निवेदनाव्दारे केली आहे.

टॅग्स :washimवाशिम