ऑर्डरमध्ये अडकली वीजजोडणी
By Admin | Updated: June 2, 2014 01:10 IST2014-06-02T00:55:11+5:302014-06-02T01:10:33+5:30
मालेगावात दीड वर्षानंतरही वीज वितरण कंपनीला कृषीपंपजोडणीचा ५0 टक्केआकडाही गाठता आला नाही

ऑर्डरमध्ये अडकली वीजजोडणी
मालेगाव : बिलाच्या थकित रकमेपोटी तातडीने कृषीपंप जोडणीचा दंडुका उगारणारी वीज वितरण कंपनी कर्तव्याच्या बाबतीत मात्र गाढ झोपी गेली असल्याची बाब कृषीपंप जोडणीच्या विलंबाने उजेडात आणली आहे. दीड वर्षानंतरही वीज वितरण कंपनीला कृषीपंप जोडणीचा ५0 टक्के आकडाही गाठता आला नसल्याची शोकांतिका आहे. नवीन ऑर्डर नसल्याने कृषीपंप जोडणीचे काम ठप्प पडले आहे, अशी माहिती समोर येत आहे. दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकर्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. वाशिम जिल्ह्यात १३२५ कृषीपंप व वीजजोडणीचे उद्दिष्ट मिळाले होते. वीज जोडणीसाठी प्रत्येक लाभार्थी ६६५0 रुपयाप्रमाणे ८८ लाख ११ हजार २५0 रुपये शुल्क एप्रिल ते मे २0१२ मध्येच कृषी विभागाने वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमा केले आहे. आतापर्यंत रिसोड, मालेगाव, मानोरा, वाशिम, मंगरुळपीर व कारंजा या तालुक्याने अध्र्यापर्यंतही वीजजोडणी दिली नाही.नवीन ऑर्डर नसल्याने हा घोळ झाल्याचे सांगितले जात आहे. वीज वितरणने शेतकर्यांच्या भावनांशी जणू खेळ मांडला आहे.