शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी वाशिम जिल्ह्यातील केवळ २ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 2:08 PM

वाशिम: गतवर्षी एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

ठळक मुद्दे शासनाने आर्थिक मदत म्हणून ११०,०९,००,७५० (एकशे दहा कोटी नऊ लक्ष सातशे पन्नास रुपये) इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील केवळ दोन शेतकºयांचा समावेश आहे.राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हे प्रमाणही सर्वात कमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: गतवर्षी एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  या नुकसानीपोटी आर्थिक भरपाई म्हणून शासनाने २ लाख ७९ हजार ५२२ अतिवृष्टी बाधित शेतकºयांना मदत जाहीर केली. यात वाशिम जिल्ह्यातील केवळ २ शेतकºयांचा समावेश आहे. माहे एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते. या नुकसानीची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना क्षेत्रिय अधिकाºयांना देण्यात आल्या होत्या. या पंचनाम्यानंतर शासन निकषानुसार राज्यभरातील  २ लाख ७९ हजार ५२२ अतिवृष्टी बाधित शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत म्हणून ११०,०९,००,७५० (एकशे दहा कोटी नऊ लक्ष सातशे पन्नास रुपये) इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील केवळ दोन शेतकºयांचा समावेश आहे. शासनाच्या निकषानुसार जिल्ह्याती केवळ १.६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीसाठी अमरावती विभागातील १५०८ शेतकरी पात्र ठरले असून, राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हे प्रमाणही सर्वात कमी आहे. वाशिम शिवाय औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील दोनच शेतकरी पीक नुकसानीच्या मदतीस पात्र ठरले आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती