शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वाशिम जिल्ह्यात केवळ १० हजार क्विंटल कापूस खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:59 AM

मार्च ते १९ मे या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात तीन केंद्रावर कापूस खरेदी संथ गतीने सुरू असल्याने मार्च ते १९ मे या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे आणखी ७० टक्क्यांच्यावर कापूस पडून आहे; खरीप हंगाम आणि पावसाळा तोंडावर आल्याने कापूस खरेदीची गती वाढविणे आवश्यक ठरत आहे.जिल्ह्यात कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, वाशिम या चार तालुक्यात बºयापैकी कापूस घेतला जातो. पांढºया सोन्याची बाजारपेठ म्हणून कधीकाळी कारंजाची ओळख होती. आताही जिल्ह्यात सर्वाधिक कापूस पीक हे कारंजा तालुक्यात घेतले जाते. कापूस खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात चार केंद्र आहे. त्यापैकी अनसिंग व मंगरूळपीर येथे सीसीआयकडून तर कारंजा व मानोरा येथे फेडरेशनकडून कापूस खरेदी केंद्र सुरू केले. अनसिंंग येथील कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. मंगरूळपीर येथील केंद्रावर सीसीआयकडून खरेदी सुरू आहे. या केंद्रावर मार्चपूर्वी ७० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. लॉकडाउनमध्ये केवळ सात हजाराच्या आसपास कापूस खरेदी झाली. मानोरा येथील केंद्रावर ५०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून केवळ १३९ क्विंटल कापूस खरेदी झाली. कारंजा येथील केंद्रावर अडीच हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. कापूस खरेदीची गती संथ असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. ७० टक्के शेतकºयांकडे कापूस आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकºयांना पैशाची गरज आहे. शेतकºयांच्या हातात पैसा आला, तरच खते, बियाणे व अन्य शेतीविषयक कामे सुरळीत होतील.अनसिंग येथील केंद्राची पाहणीअनसिंगच्या केंद्रावरील प्रेस मशीन दुरूस्त करण्यासंबंधी सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे प्रमुख उमेश तायडे यांनी २० मे रोजी पाहणी केली. मशीन दुरूस्तीचा प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.मानोरा येथे केवळ १३९ क्विंटल कापूस खरेदीएक शेतकरी, एक टोकन, एक वाहन या प्रशासनाच्या यापूर्वीच्या धोरणामुळे कापूस खरेदीतील अडचणी शेतकº्यांसाठी डोकेदुखी ठरल्या. कापूस खरेदी करण्यासाठी विलंब होत आहे. या केंद्रावर केवळ १३९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याने दिरंगाईच्या धोरणाबाबत शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटला.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस