‘ऑनलाइन’ फेरफार पद्धत ठरतेय ‘डोकेदुखी’!
By Admin | Updated: November 7, 2016 02:47 IST2016-11-07T02:47:28+5:302016-11-07T02:47:28+5:30
‘सर्व्हर’मधील बिघाडामुळे झाला नित्याचाच; तलाठय़ांना अद्ययावत प्रशिक्षणाची गरज; शेतकरी त्रस्त!

‘ऑनलाइन’ फेरफार पद्धत ठरतेय ‘डोकेदुखी’!
शिखरचंद बागरेचा
वाशिम, दि. ६- कामात अधिक सुसूत्रता यावी, गरजूंना वेळेत संगणकीकृत कागदपत्रे मिळावीत, या उद्देशाने हस्तलिखितऐवजी ऑॅनलाइन फेरफार नोंद पद्धत लागू करण्यात आली; मात्र ही पद्धत फायदेशीर ठरण्याऐवजी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे.
ई-फेरफार नोंद निर्णयांतर्गत सुरुवातीला संगणकीकृत ७/१२, ८ अ यासह शेतीसंदर्भातील अन्य कागदपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तलाठी कार्यालयांमध्ये मिळणार्या या कागदपत्रांसाठी शेतकर्यांना दिवसभरातील शेतीची कामे सोडून तसेच पदरमोड करून तहसील कार्यालय गाठावे लागते. सेतू केंद्रात ठरावीक दिवशी कागदपत्रे मिळाली नाही, तर दुसर्या दिवशी जावे लागते. यामध्ये शेतकर्यांचा वेळ व पैशांचा अपव्यय होण्यासोबतच त्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
ई-फेरफार नोंदी अंतर्गत कागदपत्रे देण्याकरिता महसूल विभागाची सर्व कार्यालये ब्रॉडबॅन्ड इंटरनेटने जोडण्यात आली आहेत; मात्र एकाच वेळी अनेक सेतू केंद्रांमध्ये सुरू राहणार्या कामांमुळे ह्यसर्व्हरह्णमध्ये दोष उद्भवून कामात व्यत्यय निर्माण होणे, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे, यासह इतर तांत्रिक कारणांमुळे सदर कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकर्यांना तसेच ती देण्यासाठी संबंधित कर्मचार्यांना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कधी वेबपेज खुलत नाही; तर कधी अपलोड व डाऊनलोड करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे आधी उद्भवणार्या तांत्रिक अडचणी दूर करा नंतर सदर निर्णयाची अंमलबाजवणी करा, अशी मागणी संतप्त शेतकर्यांमधून होत आहे.