शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भाव गडगडल्याने नदीत फेकून दिला कांदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:35 IST

शिवणी येथील श्यामराव राजाराम कुटे नामक शेतकºयाने तर १५ जुलै रोजी भोपालपेंड नदीपात्रात कांदे फेकून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव : नेहमीच या ना त्या संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांसमोर, आता कांद्याचे भाव गडगडल्याने नवे संकट उभे ठाकले आहे. अत्यल्प भाव मिळत असल्याने आसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हताश झाले असून, शिवणी येथील श्यामराव राजाराम कुटे नामक शेतकºयाने तर १५ जुलै रोजी भोपालपेंड नदीपात्रात कांदे फेकून दिले.लॉकडाऊनमुळे आसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, जवळच्या विविध ठिकाणच्या नामांकित बाजारपेठा बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांची फरफट होत आहे. अमरावती, यवतमाळ याठिकाणी जाणारा कांदा लॉकडाऊनमुळे नेण्यात अडचणी होत्या. पाच महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव २१०० रुपये क्विंटल होते; ते आता ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल आले आहेत. कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. २०१९ मध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे शेती उत्पादीत मालाला भाव नाही आणि त्यात कांद्याचे भाव एकदम गडगडले अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. साधारणत: एक एकर कांदा पिकासाठी मशागत खर्च किमान पाच हजार रुपये, रोप पाच हजार रुपये, लागवड सात हजार रुपये, फवारणी दोन हजार रुपये, खुरपणी एक हजार रुपये, काढणी ९५०० रुपये, कांदा गोणी ३० रुपये, वाहन भाडे व हमाली ४० रुपये, बाजार समिती हमाली तोलाई प्रति गोणी १० रुपये असा किमान खर्च आहे. चालू वर्षी वातावरणातील बदलामुळे सरासरी एकरी उत्पादन १०० क्विंटलपर्यंत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील कांदा खरेदी करणाºयांची संख्या कमी झाली आहे. तर स्थानिक व्यापारी अत्यंत कमी भावात खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने लागवड खर्चही वसूल होत नाही. हताश झालेल्या श्यामराव कुटे यांनी एका एकरातील कांदा नदीपात्रात फेकून दिला. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवनी येथील शेतकरी शामराव कुटे, पंजाब ठाकरे, विठ्ठल ठाकरे, केशव भेंडेकर, जयाजी भेंडेकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी