अपघातात एक ठार; चार जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST2021-09-05T04:47:43+5:302021-09-05T04:47:43+5:30
अपघाताची पहिली घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. यात विकास भिकासिंग राठोड हे आपल्या एम एच ३७ ...

अपघातात एक ठार; चार जण गंभीर
अपघाताची पहिली घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. यात विकास भिकासिंग राठोड हे आपल्या एम एच ३७ झेड ३२०८ क्रमांकाच्या दुचाकीने काजळेश्वरहून कारंजाकडे येत असताना, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे रस्ता खराब झाल्याने ते दुचाकी घसरल्याने खाली पडले. त्यानंतर, भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने विकास भिकासिंग राठोड (४५) रा. काजळेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची दुसरी घटना ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कारंजा ते मंगरुळपीर मार्गावरील शेलुवाडा फाट्याजवळ घडली. यात सागर भाऊराव महाजनकर (२५) रा. मंगरूळपीर हे गंभीर जखमी झाले.
००००००
चैाघांचीही प्रकृती गंभीर
अपघाताची तिसरी घटना ४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान कारंजा ते अमरावती मार्गाजवळील वाल्हई फाट्याजवळ घडली. यात तिघे एम.एच. ११ सी क्यु ७५२५ क्रमांकाच्या कारने गोंदियाहून साताऱ्याकडे जात होते. दरम्यान, मार्गातील अपघातस्थळी कारला पिकअपची समोरासमोर धडक बसली. यात शिवन सतीश भोसले (२५), विठ्ठल लक्ष्मण भोसले (६५) व विक्रमसिंग विठ्ठलराव भोसले (३०) सर्व रा.राजवडी ता.मान, जि.सातारा यांचा समावेश आहे. तिन्ही अपघातांतील जखमी व्यक्तींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु चौघांचीही प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.