अंगणवाडी केंद्रांतर्फे पोषण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST2021-09-05T04:46:59+5:302021-09-05T04:46:59+5:30
सदर अभियानात ३० सप्टेंबरपर्यंत या पोषण अभियानामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी १ सप्टेंबर रोजी जनजागृती रॅली ...

अंगणवाडी केंद्रांतर्फे पोषण अभियान
सदर अभियानात ३० सप्टेंबरपर्यंत या पोषण अभियानामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी १ सप्टेंबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी पोषण आहार व पौष्टिक घटकांचे महत्व,परसबाग तयार करणे,स्तनदा व गर्भवती महिलांची तपासणी,कुपोषित बालकांचा शोध आदी उद्देशातून जिल्ह्यात संपूर्ण सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमांमध्ये १ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व अंगणवाडी सेविकांनी पोषण रॅली काढून आरोग्य विषयी विविध घोषवाक्य रॅली देण्यात आली. तसेच यामध्ये वृक्षारोपण,आहार व आरोग्य याविषयी जनजागृती करण्यात आली. गरोदर माता स्तनदा माता ० ते ६ मुले यांना आहार,आरोग्य व त्यांच्या वजनाविषयी, स्वच्छतेविषयी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे आता १ ते ३० सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गरोदर,स्तनदा माता,सहा वर्षांपर्यंतची बालके यांच्या आहारात पोषणाचे महत्व वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रबोधन करणार आहेत.