शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

आता काय पीक आल्यावर पीककर्ज देता; वंचित शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:41 IST

दरवर्षी सरकारकडून बँकांना शेतकऱ्यांना पीककर्जाचे अधिकाधिक वाटप करावे, म्हणून आदेश दिले जातात. मात्र, सहकारी बँका वगळता खासगी आणि व्यापारी ...

दरवर्षी सरकारकडून बँकांना शेतकऱ्यांना पीककर्जाचे अधिकाधिक वाटप करावे, म्हणून आदेश दिले जातात. मात्र, सहकारी बँका वगळता खासगी आणि व्यापारी बँकाकंडून शेतकऱ्यांना पीककर्ज देताना टाळाटाळ केली जाते. यंदाही असेच चित्र पाहायला मिळाले आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी खासगी आणि व्यापारी बँकांचे उंबरठे झिजवायला लागत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

००००००००००००००००००००

१०२५ कोटींच्या उद्दिष्टांपैकी ८४३ कोटींचे वाटप

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात १०२५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. दरम्यान, १८ सप्टेंबर अखेर १ लाख ९८ शेतकऱ्यांना ८४३ कोटी ६० लाख ६८ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित होऊ शकले आहे.

००००००००००००००००

सहकारी बँकांकडून उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटप

एकिकडे खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज वितरणात उदासीन असताना वाशिम जिल्ह्यात विदर्भ ग्रामीण कोकण आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या १०३ टक्क्यांहून अधिक पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे.

००००००००००००००००००००

राष्ट्रीयीकृत बँकांवर शेतकऱ्यांचा संताप

पीककर्ज वितरणात सहकारी बँकांपाठोपाठ खासगी बँकांनी निर्धारित उद्दिष्टाच्या ९३.८९ टक्के पीककर्जाचे वितरण केले आहे. तथापि, राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटपाचे प्रमाण ७९.८४ टक्केच आहे. या बँकांचे उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

०००००००००००००००००००

खरीप पीककर्ज वितरणाची स्थिती

निर्धारित उद्दिष्ट - १०२५ कोटी

पात्र शेतकरी संख्या - १,०४,७९१

प्रत्यक्ष पीककर्ज वितरण - ८४३६०.६८ (कोटी)

पीकर्जाचा लाभ मिळालेले शेतकरी - १,००,०९८

००००००००००००००००००००

कोट:

खरीप हंगामात बियाणे, खतांसह इतर खर्चासाठी पीककर्ज मिळावे म्हणून बँंकांकडे कामधंदे सोडून येरझाऱ्या घालाव्या लागतात. परंतु, बँका दखल घेत नाहीत. आता खरीप हंगाम उलंगवाडीवर आला आहे. त्यामुळे पीक आल्यावर शेतकऱ्यांना कर्ज देता काय, असा आमचा सवाल आहे.

-नितीन पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर,

०००००००००००००००००००

कोट: यंदाच्या खरीप हंगामात बँकेकडून पीककर्ज मिळावे, अशी अपेक्षा होती. कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रस्तावही सादर केला; परंतु पीककर्ज नाकारण्यात आले. त्यामुळे उसनवार करून पेरणी केली, खते विकत घेतली. आता पीक निघाल्यावर त्याची परतफेड करू.

- अजय ढोक,

शेतकरी, इंझोरी