शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

आता काय पीक आल्यावर पीककर्ज देता; वंचित शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:41 IST

दरवर्षी सरकारकडून बँकांना शेतकऱ्यांना पीककर्जाचे अधिकाधिक वाटप करावे, म्हणून आदेश दिले जातात. मात्र, सहकारी बँका वगळता खासगी आणि व्यापारी ...

दरवर्षी सरकारकडून बँकांना शेतकऱ्यांना पीककर्जाचे अधिकाधिक वाटप करावे, म्हणून आदेश दिले जातात. मात्र, सहकारी बँका वगळता खासगी आणि व्यापारी बँकाकंडून शेतकऱ्यांना पीककर्ज देताना टाळाटाळ केली जाते. यंदाही असेच चित्र पाहायला मिळाले आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी खासगी आणि व्यापारी बँकांचे उंबरठे झिजवायला लागत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

००००००००००००००००००००

१०२५ कोटींच्या उद्दिष्टांपैकी ८४३ कोटींचे वाटप

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात १०२५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. दरम्यान, १८ सप्टेंबर अखेर १ लाख ९८ शेतकऱ्यांना ८४३ कोटी ६० लाख ६८ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित होऊ शकले आहे.

००००००००००००००००

सहकारी बँकांकडून उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटप

एकिकडे खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज वितरणात उदासीन असताना वाशिम जिल्ह्यात विदर्भ ग्रामीण कोकण आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या १०३ टक्क्यांहून अधिक पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे.

००००००००००००००००००००

राष्ट्रीयीकृत बँकांवर शेतकऱ्यांचा संताप

पीककर्ज वितरणात सहकारी बँकांपाठोपाठ खासगी बँकांनी निर्धारित उद्दिष्टाच्या ९३.८९ टक्के पीककर्जाचे वितरण केले आहे. तथापि, राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटपाचे प्रमाण ७९.८४ टक्केच आहे. या बँकांचे उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

०००००००००००००००००००

खरीप पीककर्ज वितरणाची स्थिती

निर्धारित उद्दिष्ट - १०२५ कोटी

पात्र शेतकरी संख्या - १,०४,७९१

प्रत्यक्ष पीककर्ज वितरण - ८४३६०.६८ (कोटी)

पीकर्जाचा लाभ मिळालेले शेतकरी - १,००,०९८

००००००००००००००००००००

कोट:

खरीप हंगामात बियाणे, खतांसह इतर खर्चासाठी पीककर्ज मिळावे म्हणून बँंकांकडे कामधंदे सोडून येरझाऱ्या घालाव्या लागतात. परंतु, बँका दखल घेत नाहीत. आता खरीप हंगाम उलंगवाडीवर आला आहे. त्यामुळे पीक आल्यावर शेतकऱ्यांना कर्ज देता काय, असा आमचा सवाल आहे.

-नितीन पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर,

०००००००००००००००००००

कोट: यंदाच्या खरीप हंगामात बँकेकडून पीककर्ज मिळावे, अशी अपेक्षा होती. कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रस्तावही सादर केला; परंतु पीककर्ज नाकारण्यात आले. त्यामुळे उसनवार करून पेरणी केली, खते विकत घेतली. आता पीक निघाल्यावर त्याची परतफेड करू.

- अजय ढोक,

शेतकरी, इंझोरी