शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिक्षक नाही मिळाले, ZP शाळेला कुलूप ठोकले; गावकरी आक्रमक

By संतोष वानखडे | Updated: February 12, 2024 12:50 IST

संबंधित शिक्षकाने भोयता शाळेवर रूजू व्हावे याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशितही केले होते.

वाशिम : वाशिम तालुक्यातील भोयता येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळाले नसल्याने अखेर गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि १२ फेब्रुवारीला शाळेला कुलूप ठोकले. भोयता येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय दत्तराव वाघ हे शाळेत रुजू झाले होते. मात्र, अचानक १८ डिसेंबर २०२३ पासून शाळेवर परत आले नाहीत. ते जि.प. शाळा धानोरा बु. येथे बदली करून रुजू झाल्याने भोयता येथील शाळेत शिक्षकाचे पद रिक्त झाले. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संबंधित शिक्षकांनी भोयता शाळेत रुजू होण्याबाबत यापूर्वी गावकऱ्यांसह शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

संबंधित शिक्षकाने भोयता शाळेवर रूजू व्हावे याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशितही केले होते. परंतू, अद्यापही ते रूजू झाले नाहीत, असे निवेदनात नमूद आहे. संबंधित शिक्षकांनी भोयता शाळेवर रूजू व्हावे अन्यथा शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागात विद्यार्थ्यांची शाळा भरविली जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद्र देशमुख, राहुल तिडके व पालकांनी यापूर्वीच दिला होता. मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही शिक्षक रुजू झाले नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांनी १२ फेब्रुवारीला शाळेला कुलूप ठोकले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष निलेश पोले, राहुल तिडके सुनील इंगळे, दीपक नितनवरे, भगवान वानखडे, विजय देवकर, अनिल गायकवाड, रमेश पोले, सिद्धार्थ इंगळे, भीमराव राऊत यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाTeacherशिक्षक