शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

वाशिम जिल्ह्यातील हुतात्मा स्मारके दुर्लक्षीत; स्मारकांवरील नावेही झाली पुसट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 11:31 IST

स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ आॅगस्ट १९४२ या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच दिवशी भारताला इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त करण्याची पहिली ठिणगी पडली होती. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी यादिवशी प्रथमच क्रांतीची भाषा करून इंग्रजांविरूद्ध ‘चले जाव’चा नारा दिला. त्यापुढील काळात १५ आॅगस्ट १९४७ पर्यंत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जिल्ह्यातील अनेकांनी प्राणाची आहुती दिली; स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर त्याच स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जीवाचे बलिदान देणाºया स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ वाशिम शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी शहीद स्तंभ व स्मारक उभारल्या गेले आहेत; मात्र केवळ स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, क्रांती दिन अथवा अन्य राष्ट्रीय सणांच्या दिवशीच या स्मारकांची थातूरमातूर पद्धतीने स्वच्छता केली जाते. यावर्षी तर स्मारक परिसरात स्वच्छताही करण्यात आली नसल्याचे क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला रिसोड, शिरपूर, वाशिम, मालेगाव, कारंजा येथे केलेल्या पाहणीत दिसून आले. रिसोड येथे पंचायत समिती परिसरात असलेल्या स्मारकासभोवताल निरूपयोगी झाडेझुडपे वाढली आहेत तर जिल्ह्यातील काही स्मारकांचा रंग पूर्णत: उडण्यासह त्यावरील नावेही पुसट झाली आहेत. कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव येथील स्मारकांना सौंदर्यीकरणाची प्रतिक्षा आहे.

शिरपूर येथील स्मारकाची दुरावस्थादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होवून प्राणाची आहूती देणाºया शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिरपूर येथे स्वातंत्र्य सेनानी स्मारकाची उभारणी करण्यात आली. सुरूवातीची २५ ते ३० वर्षे येथे नियमित कार्यक्रमांचे आयोजन व्हायचे; परंतु कालांतराने या स्मारकस्थळी कार्यक्रम घेणे बंद झाले. या ठिकाणी आता घाण पसरत असून, स्मारकाची दुरावस्था झाल्याचे दिसून येते.

कारंजात कारंजे पडले बंद !काही वर्षांपूर्वी कारंजातील जयस्तंभाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. सौंदर्यीकरण करण्याच्या हेतूने आजुबाजूने पाण्याचे कारंजे उभारले गेले होते. आता हे कारंजे बंद पडले आहेत. त्यातच या स्मारकाशेजारी किरकोळ व्यावसायिक आपली दुकानेही थाटून बसत असतात. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षीत आहे.

स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणाºया सेनानींच्या स्मरणार्थ रिसोड पंचायत समिती परिसरात स्तंभ उभारण्यात आला. या स्तंभाच्या अवतीभोवती काही झाडे, झुडपे वाढली आहेत, ही बाब उचित नाही. लवकरच यासंदर्भात कार्यवाही करून या परिसराची स्वच्छता करण्यात येईल.- एस.व्ही. इस्कापे,प्रभारी गटविकास अधिकारीपंचायत समिती, रिसोड

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRisodरिसोडShirpur Jainशिरपूर जैनMartyrशहीद