शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाळकीवासीयांची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुष्काळावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:16 IST

शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी खेळत असून माती अडविण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुष्काळाच्या दृष्टचक्रातून कायमचे बाहेर पडायचे असेल तर शेतशिवारांमध्ये पाणी अडविण्यासोबतच वाहून जाणारी सुपीक माती धुऱ्याच्या बाहेर जाता कामा नये, हे सूत्र अंगीकारून तालुक्यातील वाळकी-दोडकी येथील शेतकऱ्यांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने जल व मृद संधारणाचे काम करण्यात आले. यामुळे सद्या तेथील शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी खेळत असून माती अडविण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे.पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक, राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त शेतकरी सुभाष नानवटे यांनी गत तीन ते चार वर्षांपासून गावाला दुष्काळाच्या छायेतून कायमचे बाहेर काढण्यासाठी गावकºयांच्या सहकार्याने विविध स्वरूपातील प्रयोग केले. त्यात प्रामुख्याने शेतशिवारांमध्ये ठिकठिकाणी सीसीटी, दगडी बांध, माती नाला बांध, धुºयावर वृक्षलागवड आदी उपक्रमांचा समावेश आहे. जलसंधारणाची ही कामे परिणामकारक ठरली असून माथ्यावरून वाहून जाणारे पाणी व त्यासोबतच वाहून जाणारी माती अडविणे साध्य झाले आहे.शेतशिवारांमध्ये विविध ठिकाणी श्रमदानातून प्रत्येक एक घनमीटर खोलीचा खड्डा तयार करण्यात आला. प्रत्येक खड्डयात हजार लीटर याप्रमाणे लाखो लिटर पाणी साठविणे यामुळे शक्य झाले. शेतातील ज्या भागातून माती वाहून जाते, त्याठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले. यामुळे शेतांमधील सुपीक माती शेतातच राहून उत्पादनात वाढ झाल्याचे सुभाष नानवटे यांनी सांगितले. 

खरीप व रब्बी हंगामात भरघोस उत्पन्न गावात कधीकाळी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवायचे. पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकºयांना नापिकीचा सामना करावा लागायचा. जलसंधारणाच्या विविध कामांमुळे मात्र परिस्थिती पूर्णत: बदलली असून खरीप व रब्बी हंगामात भरघोस उत्पन्न मिळत असल्याची माहिती शेतकरी सुभाष नानवटे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी