शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

सर आली धावून... राज्यातील २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस

By दादाराव गायकवाड | Published: September 02, 2022 4:59 PM

जुलै, ऑगस्टमधील दमदार पावसाचा परिणाम

वाशिम: राज्यात यंदा मान्सून विलंबाने दाखल झाला असला तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या सरासरीत कमालीची वाढ झाली असून, हवामान विभागाच्या अहवालानुसार १ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ पैकी तब्बल २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मान्सून विलंबाने दाखल झाल्यानंतर जुलैपासून राज्याच्या विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला, ऑगस्टमध्ये पावसाचा धडाका अधिकच वाढला. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी खूप अधिक राहिली. ऑगस्टमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले, शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले होते. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २४९ तालुक्यांत १ जूनपासून १ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद आहे. शिवाय तर ९५ तालुक्यात ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आहे. शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस असलेल्या २४९ तालुक्यांत नांदेड (१६), यवतमाळ (१५), नागपूर (१४), नाशिक, अहमदनगर आणि चंद्रपूर (प्रत्येकी १३), पुणे (१२), गडचिरोली (११) आणि सांगली (१०) या नऊ जिल्ह्यातीलच ९१ तालुक्यांचा समावेश आहे.

११ तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

एकीकडे ३५५ तालुक्यांपैकी २४९ तालुक्यात पावसाचे प्रमाण शंभर टक्क्यांपेक्षा अधिक असताना ११ तालुक्यात पावसाचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोट, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, नाशिकमधील इगतपुरी, जळगावमधील बोधवाडा, सोलापुरातील सांगाेळा, साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील चांदगड, राधानगरी आणि बावडा, तसेच परभणी जिल्ह्यातील परभणी आणि पथारी या दोन तालुक्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊसwashimवाशिम