शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मंगरुळपीर : ‘नाफेड’कडून मालाच्या चुकार्‍यांना विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:14 AM

मंगरुळपीर: शासनाने यंदा सोयाबीनसह उडीद, मुगाच्या खरेदीसाठी सहा ठिकाणी शासकीय खरेदी सुरू केली. या ठिकाणी हमीभावाने खरेदी करून शेतकर्‍यांना आठवडाभरात चुकारे देण्याची घोषणाही केली; प्रत्यक्षात १५ दिवस उलटल्यानंतरही सोयाबीनचे चुकारे मिळत नसल्याचे या संदर्भात घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  शासनाला आपल्याच घोषणेचा विसर पडल्याचे स्पष्ट होत आहे. 

ठळक मुद्देशासनाला पडला विसरआठ दिवसांत चुकारे देण्याची घोषणा फोल!  

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: शासनाने यंदा सोयाबीनसह उडीद, मुगाच्या खरेदीसाठी सहा ठिकाणी शासकीय खरेदी सुरू केली. या ठिकाणी हमीभावाने खरेदी करून शेतकर्‍यांना आठवडाभरात चुकारे देण्याची घोषणाही केली; प्रत्यक्षात १५ दिवस उलटल्यानंतरही सोयाबीनचे चुकारे मिळत नसल्याचे या संदर्भात घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  शासनाला आपल्याच घोषणेचा विसर पडल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाने नाफेडच्यावतीने शेतमालाची खरेदी हमीभावाने करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात सहा शासकीय खरेदी केंद्र सुरू केले आहेत. या ठिकाणी माल विकण्यासाठी शेतकर्‍यांची रीतसर नोंदणीही करण्यात आली.  शेतकर्‍यांना या ठिकाणी विकलेल्या शेतमालाचे चुकारे आठ दिवसांत देण्यात येतील असेही शासनाने जाहीर केले.  तथापि,  शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल विकणार्‍या शेतकर्‍यांना १५ दिवसही चुकारे मिळत नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात यंदा दोन महिन्यांपूर्वी नाफेडच्यावतीने हमीभावात शेतमाल खरेदी सुरू करण्यात आली. त्या अंतर्गत सुरुवातील उडीद आणि मुगाची खरेदी सुरू झाली आणि आजवर जिल्ह्यात ४0 हजार २२७ क्विंटल उडीद आणि ८८१ क्विंटल मूग शेतकर्‍यांकडून हमीभावात खरेदी करण्यात आला. त्यानंतर नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी सुरू झाल्यानंतर १४ डिसेंबरपर्यंत ४ हजार १९८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. शासकीय खरेदी केंद्रांवर विकलेल्या शेतमालाचे चुकारे शेतकर्‍यांना शासनाच्या घोषणेनुसार ८ दिवसांत मिळणे अपेक्षित आहे; परंतु जिल्ह्यातील सहाही केंद्रावर ४ डिसेंबरनंतर  खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचे चुकारे अद्याप अदा करण्यात आले नाही. संबंधित संस्थांनी काही शेतकर्‍यांना त्यांच्याकडील निधीतून चुकारे केले असले तरी, संबंधित संस्थांकडे आता पुरेसा निधी नसल्याने शेतकर्‍यांची पंचाईत होणार आहे. 

साठवणुकीनंतरच केली जाते निधीची मागणीराज्य शासनाच्यावतीने नाफेडसाठी जिल्ह्यात शासकीय केंद्रावर खरेदी झालेला शेतमाल केंद्रीय किंवा राज्य वखार महामंडळाच्या गोदामांत साठविण्यात येतो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदी झालेल्या शेतमालाची आकडेवारी जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांकडे पाठविण्यात येते आणि त्यानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे अदा करण्यासाठी निधीची मागणी केली जाते, अशी माहिती संबंधित अधिकार्‍यांकडून प्राप्त झाली.

शासकीय खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांकडून घेतलेला माल साठविण्यासाठी काहीवेळा तांत्रिक कारणामुळे विलंब होतो. त्यामुळे शेतमाल साठवणुकीपूर्वी खरेदी झालेल्या शेतमालाची प्रत्यक्ष आकडेवारी संबंधित कार्यालयाकडे प्राप्त होत नाही आणि त्यामुळेच या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने शेतकर्‍यांना नियोजित वेळेत चुकारे मिळणे कठीण झाल्याचे स्पष्ट होत आहे; मात्र जवळचा माल विकून झाल्यानंतर अनेक दिवस त्याचे पैसे मिळत नसल्याने जिल्हय़ातील शेतकर्‍यांमधून ‘नाफेड’च्या कार्यप्रणालीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम