शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

VIDEO- गावाची पाणीटंचाई मिटविण्याचा त्याने उचलला विडा, एकटाच करतोय गावतलावाचे खोलीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 3:19 PM

गावातील पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी गावकऱ्यांना प्रेरित करूनही काहीच फायदा झाला नाही.

- नाना देवळे 

वाशिम: गावातील पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी गावकऱ्यांना प्रेरित करूनही काहीच फायदा झाला नाही. अखेर दयाराम राठोड यांनी  गावाची पाणीटंचाई कायम मिटविण्याचा विडा उचलला असून, ते एकटेच गावतलावाचे खोलीकरण करीत आहेत. हे अत्यंत हृदयस्पर्शी आणि तेवढेच प्रेरणादायक चित्र आहे. मंगरुळपीर तालुक्यातील माळशेलू या गावाचे. 

राज्यातील दुष्काळाची झळ सोसणाऱ्या राज्यातील गावांत पाणी फाऊंडेशनच्या संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याची निवड झाली आहे. या तालुक्यातील माळशेलू या गावाने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला खरा; परंतु श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्यासाठी मात्र ग्रामस्थ कमालीचे उदासीन आहेत. जवळपास १८०० लोकसंख्या असलेल्या माळशेलूत पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना वारंवार सोसावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन गावातील दयाराम राठोड यांनी वॉटर कप स्पर्धेसाठी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पाणी फाऊंडेशनच्या टीमच्या सहकार्याने या वॉटर हिरोने ग्रामस्थांना जलसंधारणाची कामे करण्यासाठी वारंवार प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. गावशिवारात पाणलोट उपचार व जलसंधारणासोबतच मनसंधारण व्हावे, याकरीता गावात दवंडी देऊन सभा घेतली गावकºयांना जलसंधारणाचे महत्व पटवून दिले; परंतु या गावातील लोकांकडून कवडीचाही प्रतिसाद त्याला लाभला नाही. त्यामुळे दयाराम राठोड यांनी स्वत:च जलसंधारणाच्या कामासाठी एकट्यानेच श्रमदान करण्याचा विडा उचलला. दयाराम राठोड यांनी प्रथम एकट्याच्याच श्रमदानातून स्वत:च्या घरी शोषखड्डा खोदला. तेवढ्यावर न थांबता त्यांनी गावतलावात अधिक पाणी साठविले जावे म्हणून या तलावाचे खोलीकरण सुरू केले ओ. गेले आठ दिवस ते एकटेच रखरखत्या उन्हात या तलावाचे खोलीकरण करीत आहेत. गावकºयांना जलसंधारणाच्या कामासाठी प्रेरित करता यावे म्हणून दयाराम राठोड यांनी ६ हजार रुपये खर्चून एक स्मार्ट फोनही विकत घेतला; परंतु गावकऱ्यांनी त्यापासून प्रेरणा घेणे, तर सोडाच उलट. त्याच्यावर आरोप करणे सुरु केले आहे. या कामाचा त्याला मोठा मोबदला मिळणार असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांच्या आरोपामुळे दयाराम खिन्न झाले असले तरी, श्रमदानात मात्र त्यांनी कोणतीच कसर येऊ दिली नाही. 

मला गावाची समस्या दूर करायचीयगावकरी काहीही म्हणोत. कदाचित त्यांचा गैरसमज दूर करण्यात किंवा त्यांना प्रेरित करण्या इतपत माझ्याकडेच ज्ञान नाही. तथापि, त्यांच्या आरोपांमुळे मी खिन्न होत असलो तरी, त्याचे वाईट मात्र मला वाटत नाही. हे गाव माझे आहे. त्यामुळे गावकºयांसोबतही नाते आहेच. त्यासाठीच गावतलावाचे खोलीकरण करून गावाची समस्या मला दूर करायची आहे. मी यात यशस्वी झाल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसतील. गावकºयांना त्याचा फायदा होईल, असा मला विश्वास आहे, अशी भावूक प्रतिक्रिया दयाराम राठोड यांनी दिली आहे.