शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

Maharashtra Election 2019 : दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 14:10 IST

अर्ज छानणीनंतर आता ६० उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत पाच वर्षांत दमदार तयारी करूनही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज इच्छुकांना भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी उमेदवारी नाकारून विद्यमान आमदारांनाच पुन्हा ती बहाल केली. यामुळे तीनही मतदारसंघात बंडखोरीला उधाण आले असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष, शिपींग कॉर्पोरेशनचे संचालक, माजी खासदार, माजी आमदार आदिंचा समावेश आहे. दरम्यान, ही मंडळी शेवटपर्यंत निवडणूक रिंगणात राहते की पक्षादेशापुढे झुकत माघार घेते, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.४ आॅक्टोबर या नामांकन दाखल करण्याच्या अंतीम मुदतीनंतर तीनही मतदारसंघात तब्बल ६३ जण; तर अर्ज छानणीनंतर आता ६० उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. वाशिम मतदारसंघात भाजपाकडून लखन मलिक, काँग्रेसकडून रजनी राठोड, वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्यासह अन्य २३ उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. शिवसेनेचे गतवेळचे उमेदवार नीलेश पेंढारकर यांनी यंदा अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपासमोर आव्हान उभे केले; तर राजकारणात नव्याने ‘एन्ट्री’ केलेल्या ‘वंचित’च्या डॉ. देवळेंचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून प्रामुख्याने मलिक, पेंढारकर, डॉ. देवळे आणि राठोड अशी चौरंगी लढत होईल, असे बोलले जात आहे.कारंजा-मानोरा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी विविध स्वरूपातील विकासात्मक कामे मार्गी लावली. त्याचा त्यांना निश्चितपणे मोठा फायदा होणार आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रवादीत गेलेले प्रकाश डहाके हे पाटणींच्या झंझावाताला कशाप्रकारे रोखतील, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.प्रकाश डहाकेंच्या उमेदवारीमुळे एक पाऊल मागे घेत अपक्ष उमेदवारी दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे शेवटपर्यंत रिंगणात राहतात की पक्षादेशापुढे नमते घेऊन माघार घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या मतदारसंघात ‘वंचित’कडून डॉ. राम चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली; पण ते दिग्गजांपुढे विशेष करिश्मा दाखवू शकणार नाहीत, अशी चर्चा होत आहे. यासह ‘वंचित’मधून उमेदवारीचा विचार न झाल्याने अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या युसूफ पुंजाणी यांनाही मातब्बरांच्या आव्हानाला तोंड देताना यावेळी बरीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी या मतदारसंघात प्रामुख्याने पाटणी विरूद्ध डहाके अशीच लढत होईल, असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमीत झनक यांना चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाऊन विश्वनाथ सानप यांना उमेदवारी मिळाली. यामुळे मात्र दुखावलेले माजी आमदार तथा शिपींग कॉर्पोरेशनचे विद्यमान संचालक विजयराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. याशिवाय हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जात असल्याने आधीच पक्षाला अलविदा केलेल्या दिलीप जाधव यांनी ‘वंचित’कडून उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे सद्यातरी या मतदारसंघात पंचरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.दरम्यान, या प्रमुख पाच उमेदवारांमधून कुणीही पराभूत झाल्यास त्यांच्या अनेक वर्षांच्या यशस्वी राजकीय प्रवासाला मोठा डाग लागणार असून पक्षातूनही हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा धोका पत्करून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे शेवटपर्यंत निवडणूक रिंगणात राहतात की माघार घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.‘झेंडा’ बदलणाऱ्यांची राजकीय कारकिर्द सापडू शकते धोक्यात!२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा ठेऊन राजकीय क्षेत्रातील काही दिग्गज मंडळीनी पक्षादेशाप्रमाणे संघटन मजबूतीसाठी प्रयत्न केले; मात्र उमेदवारी न मिळाल्याने कालपर्यंत भगवा झेंडा खांद्यावर असणाऱ्यांनी घड्याळाच्या काट्याप्रमाणे पुढे सरकून भूमिका बदलली. काहींनी स्वत:च्या बळावर अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर आव्हान उभे केले. ही बंडखोर मंडळी निवडणूकीत यशस्वी ठरली तर ठीक; अन्यथा आमदारकीच्या लालसेपायी ऐनवेळी ‘झेंडा’ बदलणाºयांची राजकीय कारकिर्द धोक्यात सापडू शकते, अशी चर्चा होत आहे.नवख्या उमेदवारांना करावी लागणार बरीच मेहनतवाशिम मतदारसंघातून ‘वंचित’कडून डॉ. सिद्धार्थ देवळे, काँग्रेसकडून रजनी राठोड हे दोन उमेदवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, वाशिम मतदारसंघाचे विद्यमान आमदार लखन मलिक यांच्या तुलनेत नमूद दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित, सुशिक्षित समजले जात असले तरी मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत वावरणाºया सर्वसामान्य मतदारांशी त्यांचा अद्यापपर्यंत संबंध आलेला नाही आणि आता निवडणूकीला अवघे १५ दिवस उरल्याने ते यासंदर्भात विशेष काही करूही शकणार नाहीत, असे राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे मात्र प्रथमच निवडणूकीला सामोरे जात असलेल्या या नवख्या उमेदवारांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019