अंगणवाडी केंद्रांतर्फे पोषण अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST2021-09-04T04:49:26+5:302021-09-04T04:49:26+5:30
सदर अभियानात ३० सप्टेंबरपर्यंत या पोषण अभियानामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी १ सप्टेंबर रोजी जनजागृती ...

अंगणवाडी केंद्रांतर्फे पोषण अभियानास प्रारंभ
सदर अभियानात ३० सप्टेंबरपर्यंत या पोषण अभियानामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी १ सप्टेंबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी पोषण आहार व पौष्टिक घटकांचे महत्त्व, परसबाग तयार करणे, स्तनदा व गर्भवती महिलांची तपासणी, कुपोषित बालकांचा शोध आदी उद्देशातून जिल्ह्यात संपूर्ण सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमांमध्ये १ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व अंगणवाडी सेविकांनी पोषण रॅली काढून आरोग्याविषयी विविध घोषवाक्ये रॅलीत देण्यात आली. तसेच यामध्ये वृक्षारोपण, आहार व आरोग्य याविषयी जनजागृती करण्यात आली. गरोदर माता, स्तनदा माता ० ते ६ वयोगटातील मुले यांना आहार, आरोग्य व त्यांच्या वजनाविषयी, स्वच्छतेविषयी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे आता १ ते ३० सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गरोदर, स्तनदा माता, सहा वर्षांपर्यंतची बालके यांच्या आहारात पोषणाचे महत्त्व वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रबोधन करणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी संजय जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य सेविका राठोड मॅडम व गट समन्वयक अली सर यांच्या सहयोगाने ३० सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम अंगणवाडी स्तरावर राबविणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. जनजागृती रॅलीदरम्यान वाशिम शहरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.