जिल्ह्यात ‘ट्रॅफिक सिग्नल’चा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:46 IST2021-09-12T04:46:56+5:302021-09-12T04:46:56+5:30
नंदकिशोर नारे वाशिम : जिल्हा हाेऊन तब्बल २३ वर्षे झाले, परंतु जिल्ह्यातील एकाही शहराच्या ठिकाणी ‘ट्रॅफिक सिग्नल’ दिसून येत ...

जिल्ह्यात ‘ट्रॅफिक सिग्नल’चा अभाव
नंदकिशोर नारे
वाशिम : जिल्हा हाेऊन तब्बल २३ वर्षे झाले, परंतु जिल्ह्यातील एकाही शहराच्या ठिकाणी ‘ट्रॅफिक सिग्नल’ दिसून येत नाही. यामुळे वाशिम, कारंजा, रिसाेड शहरात नागरिकांना अस्ताव्यस्त व बेताल वाहतुकीस सामाेरे जावे लागत आहे.
ट्रॅफिक सिग्नल हे रस्त्यावरचे मूक स्पीकर आहेत. ट्रॅफिक सिग्नलपुढे रस्त्यांच्या स्थितीविषयी माहिती देतात, मुख्य क्रॉस रोड किंवा जंक्शनवर पाळल्या जाणाऱ्या सूचना पुरवितात, वाहन चालकांना इशारा देतात किंवा मार्गदर्शन करतात आणि रस्ता वाहतुकीचे योग्य कार्य सुनिश्चित करतात. जिल्हा झाल्यानंतर शहरातील लाेकसंख्या, वाहने वाढलीत, परंतु एकाही शहरात सिग्नल नाही. जिल्ह्यात ६ तालुक्यांची ठिकाणे आहेत. त्या शहरामध्ये सिग्नलचा अभाव दिसून येत आहे.
वाशिम शहरामध्ये काही दिवसाआधी ट्रॅफिक सिग्नल लागणार असल्याची चर्चा झाली हाेती. यासाठी व्यापारी मंडळांनी पुढाकारही घेतल्याचे ऐकावयास मिळाले हाेते, परंतु पुढे काय झाले, याबाबत सांगता येत नाही. सिग्नल आवश्यक आहे.
ओम कव्हर, वाशिम.
शहरातील काही चाैकामध्ये सामाजिक संघटना, व्यापारी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन शहरातील वाढती वाहनसंख्या पाहता ट्रॅफिक सिग्नल उभारणे गरजेचे आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे.
राजू वानखडे, वाशिम.
वाशिम शहरातील पाटणी चाैकामध्ये तर वाहने कशी चालवावी, हा प्रश्न पडताेय. ट्रॅफिक कर्मचारी हजर असतानाही वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालविताना दिसून येतात. ट्रॅफिक सिग्नल असल्यास वाहतूक सुरळीत राहू शकते.
अभय साखरे, वाशिम.