मनुष्यबळाचा अभाव; गुन्हेगारी अनियंत्रित!
By Admin | Updated: February 15, 2016 02:14 IST2016-02-15T02:14:19+5:302016-02-15T02:14:19+5:30
वाशिम शहर पोलीस ठाण्यात केवळ ५0 टक्के कर्मचारी कर्तव्यावर.

मनुष्यबळाचा अभाव; गुन्हेगारी अनियंत्रित!
धनंजय कपाले / वाशिम: मार्चे, आंदोलने, बलात्कार, चोरी, घरफोडी या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये केवळ ५0 टक्के कर्मचारी कर्तव्यावर आहेत. परिणामी, गुन्हेगारीवर आळा घालणे व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे. वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये १२८ कर्मचार्यांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी १0८ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. या १0८ कर्मचार्यांपैकी अंदाजे २५ ते ३0 कर्मचारी वरिष्ठ कार्यालय, अधिकारी व लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून बाहेर आहेत. शहर पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावरील ७0 ंपैकी १७ कर्मचारी महिला पोलीस आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ५0 ते ५५ कर्मचार्यांच्या बळावर शहराची सुरक्षा सांभाळण्याचे कार्य सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांंपासून वरिष्ठ कार्यालयामध्ये चिटकून बसलेल्या कर्मचार्यांना पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य करणे आता नकोसे झाले आहे. अपुर्या संख्याबळामुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात पोलीस अधिकारी अपयशी ठरत असल्याचे वास्तव अलीकडे घडलेल्या अनेक घटनांमधून अधोरेखित झाले आहे. पोलीस स्टेशनमधील कर्मचार्यांच्या अपुर्या संख्याबळामुळे पोलिसांचा कारभार बेभरवशाचा झाला आहे. अत्यंत गंभीर गुन्हे भुरट्या गुन्ह्यांप्रमाणे घडत आहेत. पोलीस स्टेशनमधील स्टेशन डायरीत गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या तुलनेत गुन्हे उघडकीस (डिटेक्शन) आणण्याचे प्रमाण नगण्य होऊन बसल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढत चालली आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनुभवी कर्मचार्यांची विशेष टिम पोलीस स्टेशनच्या दिमतीला देणे अपेक्षित आहे. पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर अमरावती विभागात वाशिम शहराची नोंद क्रिमिनल शहर म्हणुन होईल, अशी भीती आता शहरवासीयांना वाटू लागली आहे. वाशिम शहरातील क्राइम रेट कमी करण्याची कसरत पोलीस यंत्रणेला करावी लागणार आहे.