खरिप पिकांनी मान टाकली
By Admin | Updated: September 29, 2014 02:27 IST2014-09-29T02:27:45+5:302014-09-29T02:27:45+5:30
पिकांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा; भारनियमनाचा व्यत्यय.

खरिप पिकांनी मान टाकली
वाशिम : जिल्ह्यात विविध संकटांमधून वाटचाल करणार्या शेतकर्यांसमोर आता पावसाने दांडी मारल्याने पिकांना वाचविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाअभावी अनेक भागातील पिके करपून जात आहेत. सिंचनाची सोय उपलब्ध असली तरी वीजपुरवठाही अनियमित राहत असल्याने ि पकांना वाचवावे कसे, या चिंतेने शेतकर्यांना ग्रासलेली शेतकर्यांचे खरिपाचे पीक मरणासन्न अवस् थेत जाऊन पोहचले आहे.
चालू खरीप हंगामात जिल्ह्यात पेरणीयोग्य साडेचार लाख हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ८८ हजार हे क्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अध्र्याअधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा, तर उर्वरित क्षेत्रात कपाशी, तूर, यासह मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल आदी पिकांची शेतकर्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी केली होती. मूग, उडिदाचे पीक फार थोड्या प्रमाणात असले तरी या पिकालाही मध्यान्हात पावसाने मारलेल्या दडीचा दणका बसला. आधीच उशिराने झालेली पेरणी, विविध प्रकारच्या किडीतून पिकांना कसेबसे सावरणार्या जिल्हाभरातील शेतकर्याला सोयाबीन या मुख्य ि पकासह इतर पीक वाचण्यासाठी आता पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीनची फुले बसली असली तरी शेंगा भरण्यासाठी शेतकर्यांना किमान एका पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकरी चा तकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातील पावसाची उशिराने सुरुवा त झाल्याने शेतकर्यांना पेरणीला एक ते दीड महिने उशिरा झाला.
सध्या सोयाबीनच्या पिकाचा दाणा भरण्याची स्थिती जिल्ह्यातील बहुतांश भागात असल्याने पावसाची गरज आहे. प्रखर तापणार्या उन्हामुळे शेतजमिनी कडक झाल्या आहेत. उष्णतेमुळे अळय़ांचा प्रादुर्भावसुद्धा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीत ओलावा नसल्याने पिके कोमेजून व करपून जात आहे. हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटात सापडले असताना, त्याला मोटारपंपाद्वारे पाणी देऊन जीवनदान देण्याचा प्रयत्न करणार्या शेतकर्यांवर अनियमित वीजभारनियमन व खंडित होणार्या वीजपुरवठय़ाने खोडा घातला आहे. वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने पिकांना पाणीही देता येत नाही. परिणामी, शेतकरी आणखीच चिंताग्रस्त बनला आहे.