शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाशिम जिल्हा: जागावाटप झाल्यानंतरच लढतींचे चित्र होणार स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 02:57 IST

वाशिम जिल्ह्यातील चित्र :सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांची मोर्चेबांधणी, विधानसभा मतदारसंघावर मित्रपक्षांचा दावा

नंदकिशोर नारे वाशिम : कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना- भारतीय जनता पक्ष युतीत जागा वाटप कशाप्रकारे होते, यावरच येत्या विधानसभा निवडणुकीचे जिल्ह्यातील राजकीय चित्र ठरणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ३ पैकी २ जागा भाजपने तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती. गेल्यावेळी भाजपा-शिवसेना दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते त्यामुळे आता जागा वाटपाचा गुंता होण्याची चिन्हे आहेत. २०१४ पूर्वी शिवसेनेच्या वाटयाला आलेला कारंजा मतदारसंघ आता पुन्हा आपल्याला मिळावा या साठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्यातरी दोन्ही मित्रपक्षातील इच्छुकांनी निवडणुकीच्या अनुषंगाने येथे मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सदर जागा भाजपाच्या वाटयास आल्यास येथे शिवसेनेमध्ये बंडखोरीची शक्यता वर्तविल्या जात आहे. भारिप-बहुजन महासंघाने (वंचित आघाडी) यावेळी कारंजा सर करण्यासाठी तयारी चालविली आहे.

वाशिम विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व असून या मतदारसंघात स्वपक्षातील इच्छुकांनी उमेदवारीमध्ये बदल करण्याची मागणी पक्षाकडे केल्याने विद्यमान आमदार लखन मलिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस पक्षातर्फे सुध्दा या मतदारसंघात इच्छुकांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. येत्या निवडणुकीत भाजपाच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसच्यावतिने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.रिसोड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. आमदार अमित झनक यांनी मोदी लाटेतही हा गड राखला होता त्यामुळे ते कसे आव्हान पेलतात हे पाहणे रंजक ठरेल.

काँग्रेसचे माजी राज्यमंत्री, खासदार अनंतराव देशमुख सद्यस्थितीत शांत दिसून येत आहेत. त्यांचे पुत्र अ‍ॅड. नकुल देशमुख निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांची भूमिकाही परिणाम करणारी ठरेल अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघावर शिवसंग्रामनेही दावा केला असल्याने युतीसमोरही पेच निर्माण होणार आहे.

२०१४मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय :रिसोड : अमित झनक (काँग्रेस) । मते : ७०,९३९ फरक १६,७०८.सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : कारंजा : युसूफ पुंजाणी(भारिप-बहुजन महासंघ) - ४,१४७ ( विजयी - राजेंद्र पाटणी, भाजपा).

एकूण जागा : ३ । सध्याचे बलाबल भाजप - २, कॉँग्रेस-१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा