अर्धवट रस्त्यामुळे अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:01+5:302021-08-14T04:47:01+5:30

--------------------- प्रकल्पाच्या सांडव्यावर नियंत्रण ठेवावे! वाशिम: पाटबंधारे विभागांतर्गत येणारे १२५ प्रकल्प शंभर टक्के भरल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होतो. विसर्ग ...

Increase in accidents due to partial road | अर्धवट रस्त्यामुळे अपघातांत वाढ

अर्धवट रस्त्यामुळे अपघातांत वाढ

---------------------

प्रकल्पाच्या सांडव्यावर नियंत्रण ठेवावे!

वाशिम: पाटबंधारे विभागांतर्गत येणारे १२५ प्रकल्प शंभर टक्के भरल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होतो. विसर्ग होणा-या पाण्यावर पाटबंधारे विभागाचे कसलेही नियंत्रण नाही. त्यामुळे शेतक-यांना अडचणी येत असल्याने सांडव्याच्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

---------------------

महामार्गावर पथदिवे लावावेत

वाशिम: जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर शहराच्या बाहेर अद्याप पथदिवे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे चालकांना अडचणी येत असून, या ठिकाणी पथदिवे लावण्याची मागणी होत आहे.

--------------------

आठवडी बाजार बंदच

वाशिम: जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने अनेक व्यवसाय सुरू करून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि, जिल्ह्यातील आठवडी बाजार अद्यापही भरविण्यास मुभा देण्यात आली नसल्याने बाजार व्यावसायिकांच्या अडचणी कायमच आहेत.

--------------------

लसीकरण शिबिराची मागणी

वाशिम: आरोग्य विभागाकडून जिल्हाभरात १२६ केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. तथापि, ग्रामीण भागांत अनेक नागरिकांना केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येत असल्याने गावागावांत लसीकरण शिबिर घेण्याची मागणी होत आहे.

Web Title: Increase in accidents due to partial road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.