अर्धवट रस्त्यामुळे अपघातांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:01+5:302021-08-14T04:47:01+5:30
--------------------- प्रकल्पाच्या सांडव्यावर नियंत्रण ठेवावे! वाशिम: पाटबंधारे विभागांतर्गत येणारे १२५ प्रकल्प शंभर टक्के भरल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होतो. विसर्ग ...

अर्धवट रस्त्यामुळे अपघातांत वाढ
---------------------
प्रकल्पाच्या सांडव्यावर नियंत्रण ठेवावे!
वाशिम: पाटबंधारे विभागांतर्गत येणारे १२५ प्रकल्प शंभर टक्के भरल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होतो. विसर्ग होणा-या पाण्यावर पाटबंधारे विभागाचे कसलेही नियंत्रण नाही. त्यामुळे शेतक-यांना अडचणी येत असल्याने सांडव्याच्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
---------------------
महामार्गावर पथदिवे लावावेत
वाशिम: जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर शहराच्या बाहेर अद्याप पथदिवे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे चालकांना अडचणी येत असून, या ठिकाणी पथदिवे लावण्याची मागणी होत आहे.
--------------------
आठवडी बाजार बंदच
वाशिम: जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने अनेक व्यवसाय सुरू करून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि, जिल्ह्यातील आठवडी बाजार अद्यापही भरविण्यास मुभा देण्यात आली नसल्याने बाजार व्यावसायिकांच्या अडचणी कायमच आहेत.
--------------------
लसीकरण शिबिराची मागणी
वाशिम: आरोग्य विभागाकडून जिल्हाभरात १२६ केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. तथापि, ग्रामीण भागांत अनेक नागरिकांना केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येत असल्याने गावागावांत लसीकरण शिबिर घेण्याची मागणी होत आहे.