शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

पाणीटंचाईची दाहकता; ३७ गावांसाठी विहीर अधिग्रहण, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

By नंदकिशोर नारे | Published: May 09, 2024 4:41 PM

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

नंदकिशाेर नारे, वाशिम :वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गावकऱ्यांकडून पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असून, संबंधित ग्रामपंचायतींनी पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ३७ गावांसाठी ३४ विहीर अधिग्रहण आणि ३ कूपनलिका अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. या उपाययोजना संबंधित गावात राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यंतरापासूनच पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या होत्या. अनेक गावांत पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींकडून पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्याबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येऊ लागले.

दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी १८८ गावांकरिता २१८ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. यासाठी १ कोटी ६६ लाख ७४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडाही तयार केला होता. या कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येत आहे. यात ९ मेपर्यंत ३७ गावांसाठी १७ लाख रुपये खर्चाच्या ३७ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ३४ विहिरी आणि ३ कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई