शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

ई-केवायसीत राज्यात वाशिम जिल्हा अव्वल तर भंडारा दुसऱ्या क्रमांकावर 

By संतोष वानखडे | Updated: September 8, 2022 18:08 IST

ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

वाशिम: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, दुसऱ्या क्रमांकावर भंडारा व तिसऱ्या क्रमांकावर नाशिक जिल्हा आहे. देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून घेतला. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना संपूर्ण देशभर लागू केली आहे. दर चार महिन्यांनी या योजनेचा २ हजार रुपयांचा हप्ता योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतो. 

मात्र केंद्र शासनाने या योजनेबाबत निर्णय घेऊन यापुढील हप्त्यांच्या संबंधित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक केले आहे. पुढील हप्त्यांच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी ई-केवायसी करण्याच्या जिल्हाधिकारी शण्मुगराजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया ८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली आहे. आता केवळ २५ हजार २४ शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

व्यापक प्रमाणात जनजागृतीवाशिम जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र असलेल्या १ लाख ८९ हजार ३७५ लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. १८ ऑगस्टपर्यंत ७० हजार ८६७ शेतकरी ई-केवायसी करण्यापासून दूर होते. त्यानंतर जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस यांनी पुढाकार घेत ई-केवायसीबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. त्यानुसार जनजागृती झाल्याने जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाwashimवाशिमbhandara-acभंडाराNashikनाशिक