शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करा - तिवारी
By Admin | Updated: September 10, 2015 02:16 IST2015-09-10T02:16:31+5:302015-09-10T02:16:31+5:30
आढावा बैठकीत स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या सुचना.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करा - तिवारी
वाशिम : राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून, या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी सर्व संबंधित शासकीय विभागांनी करावी, अशा सूचना करीत उपाययोजनांचा आढावा कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ९ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत घेतला. आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील, प्रभारी अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. तिवारी पुढे म्हणाले की, विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यावर तातडीने उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये सर्व शेतकर््यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दरात धान्य देणे व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देणे, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे आदी योजनांचा समावेश आहे. शेतीच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवीत आहे. या सर्व योजनांची तातडीने अंमलबजावणी करून या योजनांचा लाभ शेतकर्यांना देणे, ही सर्व संबधित शासकीय विभागांची जबाबदारी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये, असे तिवारी यांनी सांगितले. शेतकर्यांचे नैराश्य दूर करण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकार्यांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शेतकरी कर्ज पुनर्गठन, कृषीविषयक योजना, धडक सिंचन योजनेतील विहिरी, रोजगार हमी योजना तसेच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची कारणे, आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी याविषीय बैठकीत चर्चा झाली.