शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

शाळांचे मुख्याध्यापक झाले ‘आॅनलाईन कारकून’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:35 IST

  वाशिम : शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी मात्र शाळेतील मुख्याध्यापकांच्याच खांद्यावर सोपविण्यात आल्याने दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे.

ठळक मुद्दे शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत.९० टक्के शाळांमध्ये ‘नेट कनेक्टिव्हिटी’सह इतर तत्सम सुविधांचा अभाव असल्याने आॅनलाईन स्वरूपातील सर्व कामे शहरातील एखाद्या ‘सायबर कॅफे’वर बसून करावी लागतात. दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे.

 वाशिम : शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी मात्र शाळेतील मुख्याध्यापकांच्याच खांद्यावर सोपविण्यात आल्याने दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे. याशिवाय डोक्यावर सततचा ताण राहत असल्याने त्यांच्यातून दबक्या आवाजात शासनाच्या धोरणाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून शाळांसाठी पाठविला जाणारा पोषण आहार मोजून त्यांचे ‘रेकॉर्ड’ ठेवणे, त्याचा अहवाल शासनाकडे न चुकता वेळेत पाठविणे, विविध स्वरूपातील टपाल स्विकारणे आणि पाठविणे, इंटरनेटवरून विविध संकेतस्थळांवर शाळांची माहिती ‘अपलोड’ करणे यासह जिल्हा कोषागाराकडून थेट मुख्याध्यापकांच्या खात्यात शिक्षकांचा व्यवसायकर, गटविमा, एलआयसी, पतसंस्था कर्ज, बँकांचे कर्ज, सण अग्रीम, गृहकर्ज आदींची रक्कम वळती केली जात असल्याने यासंदर्भातील धनादेश त्या-त्या घटकाकडे सुपूर्द करणे आणि त्याचे ‘रेकॉर्ड’ ठेवणे, दर महिन्याला शिक्षकांचे पगारपत्रक तयार करून ते शालार्थ प्रणालीअंतर्गत ‘अपलोड’ करणे, अशी सर्व कामे मुख्याध्यापकांकडेच सोपविण्यात आलेली आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे जिल्ह्यातील ९० टक्के शाळांमध्ये ‘नेट कनेक्टिव्हिटी’सह इतर तत्सम सुविधांचा अभाव असल्याने आॅनलाईन स्वरूपातील सर्व कामे शहरातील एखाद्या ‘सायबर कॅफे’वर बसून करावी लागतात. यासाठी लागणाºया खर्चाचीही विशेष तरतूद नसल्यामुळे सर्वच शाळांचे मुख्याध्यापक त्रस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘आॅनलाईन’ प्रणाली अंमलात येण्यापूर्वी शिक्षकांच्या पगारीसह इतर सर्व कामे ‘आॅफलाईन’ असताना त्या-त्या तालुक्यांमधील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे होती; परंतू सद्या या सर्व कामांना मुख्याध्यापकांनाच न्याय द्यावा लागत असून त्यांचा बहुतांश वेळ या कामांमध्येच जात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शिकविण्याकडेही त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.  

कुठलाही मुख्याध्यापक हा त्या शाळेचा मुख्य अध्यापक असतो. मात्र, सद्य:स्थितीत सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना शासनाने अक्षरश: आॅनलाईन कारकून केले असून जास्तीत जास्त कामे त्यांनाच करावी लागत आहे. त्यापेक्षा पुर्वीप्रमाणे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ही कामे सोपविल्यास मुख्याध्यापकांसोबतच शिक्षकांनाही फायदेशीर ठरेल. यासाठी संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे आवाज उठविला जाईल.- मंचकराव तायडे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिकTeacherशिक्षक