शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST

वाशिम : शिक्षण विभागाने कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागांतील गावात आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन सुरू करण्याचे ठरविले आहे. यासाठी ...

वाशिम : शिक्षण विभागाने कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागांतील गावात आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन सुरू करण्याचे ठरविले आहे. यासाठी जि.प. शिक्षण विभागाची तयारी असली तरी, ग्रामपंचायत आणि पालकांच्या एनओसीनंतरच या शाळा सुरू होऊ शकणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी अद्यापही विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली नाही; मात्र, आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी कोरोनामुक्त गावांना प्राधान्य देण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी शाळांचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र मिळाल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापकांचा समावेश असलेल्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावस्तरावर निर्णय घेऊन तसा प्रस्ताव जि. प. शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.

................

जिल्ह्यातील एकूण गावे : ७८९

जिल्ह्यातील एकूण शाळा

शासकीय : ७७३

अनुदानित : १८४

कायम विनाअनुदानित : ४२२

.................

कोरोनामुक्त असलेली गावे : ६५५

..................

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

वाशिम - १०९

रिसोड - ६७

मालेगाव - ८७

मंगरुळपीर - ९९

मानोरा - १३२

कारंजा -१६०

...............

बॉक्स : अद्याप एकाही ग्रामपंचायतीचा ठराव नाही

जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असून, ९ जुलैच्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ १२९ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सहाही तालुक्यात प्रत्येकी २२ ते २५ पाच रुग्ण आहेत. दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायतींच्या ठरावाची आवश्यकता असली तरी जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव मंजूर करून शिक्षण विभागाकडे पाठविल्याची माहिती नाही.

...........

बॉक्स : पालकांची हा...

मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहे, तर घरच्या घरी राहून मुलांचीसुद्धा चिडचिड वाढली आहे. आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून, शाळा सुरू झाल्यास आम्ही पाल्यांना शाळेत पाठवू.

- अजय जयस्वाल, पालक

.................

कोट : जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून, सर्व व्यवहारही सुरळीत सुरू आहेत. अशा वेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आणि योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मुलेही घरच्या घरी राहून त्रस्त झाली आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पाल्यांना शाळेत पाठवू.

- जगदीश आरेकर, पालक

...............

शासनाने १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव आणि पालकांची एनओसी मागितली जात आहे. यासाठी एक समितीदेखील तयार करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून ठराव प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येतील.

- रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

....................

४३६ शाळा आहेत सज्ज

- नवीन शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात झाली. त्याच धर्तीवर सर्व शाळा सुरू करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

- इयता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार असून, त्यासाठी ४३६ शाळा सज्ज आहेत.

- शालेय परिसर, वर्गखोल्यांची साफसफाई आणि इतर सुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

- कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या आहेत.