शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आकांक्षित जिल्हयातील ग्राम पंचायत इमारतींचा अहवाल मागविला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 2:53 PM

वाशिम : राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्यातील स्वतंत्र इमारती नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे येथील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने २ मे रोजी मागितला आहे.

- संतोष वानखडेवाशिम : राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्यातील स्वतंत्र इमारती नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे येथील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने २ मे रोजी मागितला आहे. त्यानुसार वाशिम जिल्हा परिषदेने ९७ ग्राम पंचायतींना स्वतंत्र इमारत नसल्याचा अहवाल ४ मे सादर केला. स्वतंत्र इमारतीसाठी ग्राम पंचायतींना निधी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.गावपातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयाला स्वमालकीची जागा आणि स्वतंत्र इमारत असणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींना स्वमालकीची जागा असूनही स्वतंत्र इमारती नाहीत. त्यामुळे भाडेतत्वावरील तसेच पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसलेल्या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालये थाटण्यात आली आहेत. वाशिम जिल्ह्यातही जवळपास ९७ ग्रामपंचायतींना स्वमालकीची जागा आहे; मात्र स्वतंत्र इमारत नाही. केंद्र सरकारच्या निधी आयोगांतर्गत आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत वाशिमसह नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या आकांक्षित जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत महत्वाकांक्षी जिल्ह्यातील स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींचा अहवाल राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे येथील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने २ मे रोजी मागविला आहे. शासनाच्या विविध योजना व इतर उपक्रमांमधून काही ग्राम पंचायतींना इमारत बांधकामे मंजूर झालेली आहेत. अशा इमारत मंजूर असलेल्या ग्रामपंचायती वगळून अद्याप ज्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकाम मंजूर झालेले नाही व बांधकामासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध आहे, अशा ग्राम पंचायतींच्या नावांची तालुकानिहाय यादी मागविली आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत (आरजीएसए) ग्राम पंचायतींच्या इमारत बांधकामांना मंजूरी देण्याची बाब विचाराधीन असून, त्यानुषंगाने हा अहवाल मागविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यानुसार या चारही जिल्ह्यातून स्वमालकीची इमारत नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल पाठविण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ९७, नंदूरबार ४२, गडचिरोली ४३ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५१ अशा ग्राम पंचायतींचा समावेश आहे. स्वमालकीची जागा असलेल्या; परंतू स्वमालकीची इमारत नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील ९७ ग्राम पंचायतींचा अहवाल पाठविण्यात आला आहे.- नितीन माने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत