वाशिम जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा द्या!
By Admin | Updated: December 3, 2014 23:42 IST2014-12-03T23:42:44+5:302014-12-03T23:42:44+5:30
शिवसेना पदाधिका-यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वाशिम जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा द्या!
वाशिम : दुष्काळाच्या चटक्यांनी होरपळणार्या जिल्ह्यातील शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकार्यांमार्फत दिलेल्या निवेदना तून ही मागणी करण्यात आली आहे.
यंदा जिल्ह्यात भिषण दुष्काळ पडला आहे. जिल्ह्यातील पैसेवारीने ही बाब अधोरेखित केली आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आलेली आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकर्यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. यातूनच पून्हा एकदा शेतकरी आत्महत्येचे लोण वाढत चालले आहे. याला आळा घालण्यासाठी सरकारनेच शेतकर्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे शिवसेनेने जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्यात यावी, पिक विमा योजनेचे पैसे तात्काळ देण्यात यावे, संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, जिल्ह्यातील चाराटंचाई डोळ्यासमोर ठेऊन जनावरांसाठी चाराछावण्या सुरू करण्यात याव्या आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी उपजिल्हाप्रमुख माणिक देशमुख, रामदास मते, गजानन भांदुर्गे, दिलीप काष्टे, रामा इंगळे, गणेश पवार, कैलास गोरे, नारायण गोटे आदींसह शिवसैनिकांची उ पस्थिती होती.