शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेऊन खावी लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:46 IST

कधी काळी शेतकरी बैलांच्या आधारे शेतीवर अधिकाधिक भर देत होेते. त्यावेळी शेतकऱ्यांकडील गुरांची संख्याही अधिक होती. त्यामुळे स्वत:च्या घरी ...

कधी काळी शेतकरी बैलांच्या आधारे शेतीवर अधिकाधिक भर देत होेते. त्यावेळी शेतकऱ्यांकडील गुरांची संख्याही अधिक होती. त्यामुळे स्वत:च्या घरी खाण्यासह गुरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्ये मोठ्या प्रमाणात पेरले जायचे. मागील तीन दशकांत मात्र गुरांचा वापर कमी होत गेला आणि यांत्रिक शेतीवर शेतकऱ्यांनी भर दिला, तसेच वन्य प्राण्यांचा वैताग वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, ज्वारीकडे पाठ केली. गत तीन वर्षांत जिल्ह्यात २ हजार हेक्टरपेक्षा अधिक प्रमाणात ज्वारीचे क्षेत्र घटले असून, आता शेतकऱ्यांनाही विकत घेऊन ज्वारी खावी लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

-------------------------

१) असा घटला ज्वारीचा पेरा (हेक्टर्समध्ये)

२०१७ - २७८०.१५

२०१८ - २५१०.२१

२०१९ - २०६०.००

२०२० - १६४०.००

२०२१ - ७५२.८१

२) यंदा कोणत्या पिकाचा किती पेरा?

पीक पेरा (हेक्टर्समध्ये)

ज्वारी - ७५२.८१

सोयाबीन - ३,०२,६९२.८०

तूर- ६०,०५४.०३

मूग- ३,९५५.८७

उडीद - ६९९४.४७

कपाशी - २१,३६७.३२

---------------

३) का फिरविली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ?

कोट: ज्वारी हे पारंपरिक पीक आता शेतकऱ्यांना परवडणारे राहिले नाही. पिकांसाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नाही. त्यात वन्य प्राण्यांचा वैताग, तसेच निसर्गाचा लहरीपणा आदी कारणांमुळे शेतकरी आता ज्वारीची पेरणी करण्यास उत्सुक नाहीत. तथापि, खरीप हंगामातील ज्वारी ही चाऱ्यासाठीच अधिक वापरतात आणि आता यांत्रिक शेतीवर भर असल्याने गुरांची संख्या कमी झाली. परिणामी, चारा पिकांचे क्षेत्र घटले आहे.

- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

-----------------

४) शेतकऱ्यांना हवे पैशांचे पीक

१) कोट: ज्वारीला बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या ज्वारीला हजार रुपयेही मिळत नाहीत. उलट खर्च अधिक असून, वन्य प्राण्यांचाही या पिकाला धोका आहे. त्यामुळे ज्वारीचे पीक परवडणारे राहिले नाही. ज्या पिकातून अपेक्षित उत्पन्नच मिळत नसल्याने त्याची पेरणी करून फायदा तरी काय?

-नितीन उपाध्ये, शेतकरी, काजळेश्वर.

---------------

२) वन्य प्राण्यांचा ज्वारीच्या पिकाला मोठा धोका असतो. पूर्वी चाऱ्यासाठी आम्ही ज्वारीची पेरणी करायचो, परंतु या पिकांवर येणारा खर्च, वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान लक्षात घेता, उत्पन्नापेक्षा तोटाच अधिक आहे. या उलट सोयाबीनसारख्या पिकावर कमी खर्च येऊनही अधिक उत्पन्न मिळते. आम्ही आता नावापुरतीच ज्वारीची पेरणी करतो.

- नंदकिशोर तोतला, शेतकरी, इंझोरी