शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेऊन खावी लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:46 IST

कधी काळी शेतकरी बैलांच्या आधारे शेतीवर अधिकाधिक भर देत होेते. त्यावेळी शेतकऱ्यांकडील गुरांची संख्याही अधिक होती. त्यामुळे स्वत:च्या घरी ...

कधी काळी शेतकरी बैलांच्या आधारे शेतीवर अधिकाधिक भर देत होेते. त्यावेळी शेतकऱ्यांकडील गुरांची संख्याही अधिक होती. त्यामुळे स्वत:च्या घरी खाण्यासह गुरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्ये मोठ्या प्रमाणात पेरले जायचे. मागील तीन दशकांत मात्र गुरांचा वापर कमी होत गेला आणि यांत्रिक शेतीवर शेतकऱ्यांनी भर दिला, तसेच वन्य प्राण्यांचा वैताग वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, ज्वारीकडे पाठ केली. गत तीन वर्षांत जिल्ह्यात २ हजार हेक्टरपेक्षा अधिक प्रमाणात ज्वारीचे क्षेत्र घटले असून, आता शेतकऱ्यांनाही विकत घेऊन ज्वारी खावी लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

-------------------------

१) असा घटला ज्वारीचा पेरा (हेक्टर्समध्ये)

२०१७ - २७८०.१५

२०१८ - २५१०.२१

२०१९ - २०६०.००

२०२० - १६४०.००

२०२१ - ७५२.८१

२) यंदा कोणत्या पिकाचा किती पेरा?

पीक पेरा (हेक्टर्समध्ये)

ज्वारी - ७५२.८१

सोयाबीन - ३,०२,६९२.८०

तूर- ६०,०५४.०३

मूग- ३,९५५.८७

उडीद - ६९९४.४७

कपाशी - २१,३६७.३२

---------------

३) का फिरविली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ?

कोट: ज्वारी हे पारंपरिक पीक आता शेतकऱ्यांना परवडणारे राहिले नाही. पिकांसाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नाही. त्यात वन्य प्राण्यांचा वैताग, तसेच निसर्गाचा लहरीपणा आदी कारणांमुळे शेतकरी आता ज्वारीची पेरणी करण्यास उत्सुक नाहीत. तथापि, खरीप हंगामातील ज्वारी ही चाऱ्यासाठीच अधिक वापरतात आणि आता यांत्रिक शेतीवर भर असल्याने गुरांची संख्या कमी झाली. परिणामी, चारा पिकांचे क्षेत्र घटले आहे.

- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

-----------------

४) शेतकऱ्यांना हवे पैशांचे पीक

१) कोट: ज्वारीला बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या ज्वारीला हजार रुपयेही मिळत नाहीत. उलट खर्च अधिक असून, वन्य प्राण्यांचाही या पिकाला धोका आहे. त्यामुळे ज्वारीचे पीक परवडणारे राहिले नाही. ज्या पिकातून अपेक्षित उत्पन्नच मिळत नसल्याने त्याची पेरणी करून फायदा तरी काय?

-नितीन उपाध्ये, शेतकरी, काजळेश्वर.

---------------

२) वन्य प्राण्यांचा ज्वारीच्या पिकाला मोठा धोका असतो. पूर्वी चाऱ्यासाठी आम्ही ज्वारीची पेरणी करायचो, परंतु या पिकांवर येणारा खर्च, वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान लक्षात घेता, उत्पन्नापेक्षा तोटाच अधिक आहे. या उलट सोयाबीनसारख्या पिकावर कमी खर्च येऊनही अधिक उत्पन्न मिळते. आम्ही आता नावापुरतीच ज्वारीची पेरणी करतो.

- नंदकिशोर तोतला, शेतकरी, इंझोरी