शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेऊन खावी लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:46 IST

कधी काळी शेतकरी बैलांच्या आधारे शेतीवर अधिकाधिक भर देत होेते. त्यावेळी शेतकऱ्यांकडील गुरांची संख्याही अधिक होती. त्यामुळे स्वत:च्या घरी ...

कधी काळी शेतकरी बैलांच्या आधारे शेतीवर अधिकाधिक भर देत होेते. त्यावेळी शेतकऱ्यांकडील गुरांची संख्याही अधिक होती. त्यामुळे स्वत:च्या घरी खाण्यासह गुरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्ये मोठ्या प्रमाणात पेरले जायचे. मागील तीन दशकांत मात्र गुरांचा वापर कमी होत गेला आणि यांत्रिक शेतीवर शेतकऱ्यांनी भर दिला, तसेच वन्य प्राण्यांचा वैताग वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, ज्वारीकडे पाठ केली. गत तीन वर्षांत जिल्ह्यात २ हजार हेक्टरपेक्षा अधिक प्रमाणात ज्वारीचे क्षेत्र घटले असून, आता शेतकऱ्यांनाही विकत घेऊन ज्वारी खावी लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

-------------------------

१) असा घटला ज्वारीचा पेरा (हेक्टर्समध्ये)

२०१७ - २७८०.१५

२०१८ - २५१०.२१

२०१९ - २०६०.००

२०२० - १६४०.००

२०२१ - ७५२.८१

२) यंदा कोणत्या पिकाचा किती पेरा?

पीक पेरा (हेक्टर्समध्ये)

ज्वारी - ७५२.८१

सोयाबीन - ३,०२,६९२.८०

तूर- ६०,०५४.०३

मूग- ३,९५५.८७

उडीद - ६९९४.४७

कपाशी - २१,३६७.३२

---------------

३) का फिरविली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ?

कोट: ज्वारी हे पारंपरिक पीक आता शेतकऱ्यांना परवडणारे राहिले नाही. पिकांसाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नाही. त्यात वन्य प्राण्यांचा वैताग, तसेच निसर्गाचा लहरीपणा आदी कारणांमुळे शेतकरी आता ज्वारीची पेरणी करण्यास उत्सुक नाहीत. तथापि, खरीप हंगामातील ज्वारी ही चाऱ्यासाठीच अधिक वापरतात आणि आता यांत्रिक शेतीवर भर असल्याने गुरांची संख्या कमी झाली. परिणामी, चारा पिकांचे क्षेत्र घटले आहे.

- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

-----------------

४) शेतकऱ्यांना हवे पैशांचे पीक

१) कोट: ज्वारीला बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या ज्वारीला हजार रुपयेही मिळत नाहीत. उलट खर्च अधिक असून, वन्य प्राण्यांचाही या पिकाला धोका आहे. त्यामुळे ज्वारीचे पीक परवडणारे राहिले नाही. ज्या पिकातून अपेक्षित उत्पन्नच मिळत नसल्याने त्याची पेरणी करून फायदा तरी काय?

-नितीन उपाध्ये, शेतकरी, काजळेश्वर.

---------------

२) वन्य प्राण्यांचा ज्वारीच्या पिकाला मोठा धोका असतो. पूर्वी चाऱ्यासाठी आम्ही ज्वारीची पेरणी करायचो, परंतु या पिकांवर येणारा खर्च, वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान लक्षात घेता, उत्पन्नापेक्षा तोटाच अधिक आहे. या उलट सोयाबीनसारख्या पिकावर कमी खर्च येऊनही अधिक उत्पन्न मिळते. आम्ही आता नावापुरतीच ज्वारीची पेरणी करतो.

- नंदकिशोर तोतला, शेतकरी, इंझोरी