शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पैनगंगा बॅरेजचे पाणी वाशिम शहराला देण्याच्या निषेधार्थ शेतकरी चढले ‘टॉवर’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 14:44 IST

वाशिम : शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ चक्क शेतकरी १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली.

ठळक मुद्देबॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी बॅरेजेस परिसरात वास्तव्य करणाºया ग्रामस्थांनी वाघोली फाट्यावर बेमुदत उपोषण केले हाते. १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा परिषद जवळील पवनचक्की टॉवरवर दोन शेतकरी चढले व आंदोलन केले. टॉवरवर चढणाऱ्यांमध्ये सायखेडा येथील अहीरे , सोनगव्हाण येथील उध्दव ढेकळे यांचा समावेश आहे.

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या  पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता न देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाईपलाइन अंथरण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ चक्क शेतकरी १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली. वृत्त लिहिस्तोवर शेतकरी टॉवरवरच असून प्रशासनाच्यावतिने त्यांना उतरविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

जिल्हयातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी बॅरेजेस परिसरात वास्तव्य करणाºया ग्रामस्थांनी वाघोली फाट्यावर बेमुदत उपोषण केले हाते. दरम्यान, २१ फेब्रुवारीला उपोषणकर्त्यांसह इतर हजारो नागरिकांनी  जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.  पैनंगगेत अर्धनग्न होवून आंदोलन केले. शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि शेतकºयांना बारमाही पिके घेता येणे शक्य व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले आहेत. असे असताना बॅरेजेस परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता वाशिम शहराला बॅरेजेसमधून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. असा आरोप कोकलगाव परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकाऱ्यां कडे केला होता. बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पुरविणे अन्यायकारक असून वाशिमला न देण्यासाठी तिव्र विरोध वाढला होता.  या विरोधामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नगर परिषदेच्यावतिने  वाशिम शहर तातडीची पाणी पुरवठा योजना अंतर्गत पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेज ते एकबुर्जी धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्याकरीता पोलीस अधिक्षकांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. यासाठी पोलीस अधिक्षकांनी ५ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी, १३ महिला कर्मचारी व एक आरसीपी प्लाटूनच असा तगडा बंदोबस्त कामाच्या ठिकाणी तैनात करीत पाइपलाइनच्या कामाला  प्रारंभ झाला . ही बाब परिसरातील शेतकऱ्यां ची थट्टा असल्याचे शेतकऱ्यां चे म्हणणे असून १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा परिषद जवळील पवनचक्की टॉवरवर दोन शेतकरी चढले व आंदोलन केले. टॉवरवर चढणाऱ्यांमध्ये सायखेडा येथील अहीरे , सोनगव्हाण येथील उध्दव ढेकळे यांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagitationआंदोलन