शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:11 PM

आता महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, शिवसेनेला हे राज्य सुजलाम्, सुफलाम् करायचे आहे

वाशिम - शासनाकडून कर्जमुक्तीची केवळ घोषणाच झाली आहे. आता महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, शिवसेनेला हे राज्य सुजलाम्, सुफलाम् करायचे आहे, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवार, २८ आॅगस्ट रोजी कारंजा येथे जन आशिर्वाद यात्रेला संबोधित करताना केले. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कारंजा येथे जन आशीर्वाद यात्रा घेऊन दाखल झाले. यावेळी त्यांनी  विविध विषयांवर कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघातील युवक-युवतींशी संवाद साधला. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, की ही यात्रा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन नव्हे; तर तर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी काढण्यात आली आहे. राज्यातील शेतक-यांना अद्यापपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही. पिकविम्याचा प्रश्नही प्रलंबित आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर मात करण्यासाठी जनतेची मदत हवी आहे. शेतकºयांनी आत्महत्या न करता शिवसेनेसारखा कणखर विचार करावा, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे कारंजात दाखल झाल्यानंतर आमदार गोपीकिशन बाजोरिया, पालकमंत्री संजय राठोड आणि माजी आमदार प्रकाश डहाके यांनी गुरुमाऊलीची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील शिवेसना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.   सायंकाळी ४ वाजताची सभा सुरू झाली रात्री ८ वाजतायुवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआर्शीवाद यात्रेची कारंजा येथील सभा ही सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र या सभेला रात्री ८ वाजताच्या सुमारास सुरूवात झाली. यामुळे उपस्थित शिवसैनिक आणि युवा कार्यकर्त्यांसह लोकांना तब्बल चार तास ताटकळत बसावे लागले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना