शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कारंज्यातील शेतकरी धडकले उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:42 PM

कारंजा तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. 

ठळक मुद्देकुपटी ते  कारंजा १६ कि.मी. पायदळवारी विविध मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा तालुक्यात गत ४ वर्षांपासून नैसर्गिक आणि शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी, शेतमजुर आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी कारंजा तालुक्यातील कुपटी येथील स्व. सुलभाताई इंगोले कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीला शिकणारा २२ वर्षीय विद्यार्थी मंगेश विष्णू लव्हाळे याने आपल्या वडिलाकडे असलेले कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून विहिरीत उडी घेउुन आत्महत्या केली होती. त्या विद्यार्थ्याची  आत्महत्या ही आत्महत्या नव्हे तर बलिदान ठरावे या करिता कुपटी येथील राहत्या घरापासून कारंजापर्यंत शेतकरी नेते तथा जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर व जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई गणेशपुरे यांच्या नेतृत्वात पायदळ यात्रा काढण्यात आली. या पायदळ यात्रेत शेतकरी व शेतमजुरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.तसेच माजी आमदार प्रकाश डहाके यांच्यासह जिल्हा मध्यावर्ती बँकेचे संचालक श्रीधर कानकिरड, ख.वि.स.चे अध्यक्ष बाबाराव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी व शेतमजुरांचा एल्गार मोर्चा कारंजा उपविभागीय अधीकारी यांच्या कार्यालयावर धडकला. सलग २ वर्षाच्या दुष्काळानंतर गतवर्षी परतीचा पाऊस व त्याच बरोबर नोटबंदीमुळे शेतकºयांना जबर फटका बसला. तूर पिकाचे अभूतपुर्व उत्पादन होवूनही शेतक-यांच्या नशिबी हालअपेष्टा व आर्थिक नुकसानीशिवाय काहीच आले नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतू त्याचा किती शेतक-यांना लाभ मिळाला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा परिणाम आहे असा आरोप करीत आता तर शेतक-यांची शेतकरी मुलं व तरूण मुली आत्महत्या करीत आहेत, असा दावाही मोर्चेकºयांनी केला.आपल्या वेदना सरकारसमोर सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला. एल्गार मोर्चा तहसिल परिसरात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहिर सभेत झाले. मान्यवरांनी उपस्थित शेतकरी व शेतमजुरांना मार्गदर्शन केले.  

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन