शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

गव्हापेक्षा शेतकऱ्यांची हरभऱ्याला अधिक पसंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:20 IST

अधिक उत्पादन तसेच सिंचनासाठी लागणारे कमी पाणी यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर व आॅक्टोंबर महिन्यात सतत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे खरीप हंगामात आलेला तोटा रब्बी हंगामात भरून निघेल या आशेवर रब्बी हंगामात गव्हापेक्षा हरभऱ्याला शेतकऱ्यांची पसंती झालेल्या पेऱ्यावरुन दिसून येते. हरभरा पिकाला येत असलेला कमी खर्च व त्यातून मिळणारे अधिक उत्पादन तसेच सिंचनासाठी लागणारे कमी पाणी यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सरासरी क्षेत्राच्या ३० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना आजपर्यंत २४ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली असून, यात हरभरा पिकाचे प्रमाण १८ हजार हेक्टर, तर गहू पिकाचे प्रमाण ५ हजार ५०१ हेक्टर आहे. वाशिम जिल्ह्यात सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना कृषी विभागाने १ लाख ३० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात यंदा रब्बी पेरणीचे नियोजन केले होते.तथापि, अवकाळी पावसाने आॅक्टोबरच्या मध्यंतरापासूनच थैमान घातल्याने रब्बी पिकांची पेरणी खोळंबली. त्यामुळे गळीत पिकांच्या क्षेत्रावर परिणाम झाला, तर तृण पिकांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात घटत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, हरभरा आणि गहू पिकाचे क्षेत्र यंदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६२ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रात हरभरा पिकाची पेरणी होते. सद्यस्थितीत १८ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. गहू पिकाचे क्षेत्र २८ हजार ४१७ हेक्टर अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ५ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाल्याच्या कृषी विभागाच्या अहवालावरुन शेतकºयांनी गव्हापेक्षा हरभऱ्या पसंती दिल्याचे दिसून येत आहे. कारंजा तालुक्यात १७४८ हेक्टरवर होणार रब्बीची पेरणीकारंजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, सन २०१९-२० या वर्षांत कारंजा तालुक्यात १ हजार ७४८ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. शिवाय यंदाच्या पावसाळ्यात भरपूर पाउुस झाल्याने उपलब्ध जलस्त्रोतात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्याचा वापर सिंचनासाठी करून रब्बी पेºयात वाढ करावी असा मानस शेतकºयांकडून व्यक्त केल्या जात आहे. तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पेरणी अहवालावरुन हरभºयाच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या रब्बी हंगामात कांरजा तालुक्यात सर्वाधिक १ हजार २३५ हेक्टरवर हरभरा त्यापाठोपाठ ४७० हेक्टरवर गहू तर १२ हेक्टरवर करडई आणि ३१ हेक्टरवर रब्बी हंगामातील इतर पिके पेरल्या जाण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी