शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सिंचनासाठी पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्रांचे सोनल प्रकल्पामध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 17:27 IST

शेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आहे.सिंचनासंदर्भात जिल्हाधिकारी मिश्रा यांना निवेदन ही दिले होते. मात्र अद्याप पर्यंत रब्बी पिकांसाठी पाणी सोडले नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोनल प्रकल्पात बसून आंदोलन केले. सोनल प्रकल्पातून शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी सोनल प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या शेतकरी व शेतकरी पुत्रांनी आंदोलना दरम्यान आपली मागणी लावुन धरली.कालव्याची डागडूगी करून  १९ नोव्हेंबर रोजी पाणी सोडावे अन्यथा धरणात बसून आंदोलन करू असा इशारा शेतकरी पुत्रांनी ३० आँक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिला होता. तरीही प्रशासनाने कालव्याची पुर्णपणे डागडूजी करून पाणी सोडले नाही.म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पाण्याअभावी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकापासून आवश्यक तेवढे उत्पन्न मिळाले  नाही. रब्बी हंगामात पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नूकसान होऊ नये यासाठी परिसरातील शेतकरी, शेतकरी पुत्रांनी कालवे दुरूस्त करून मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडावे अशी मागणी केली होती. परंतू प्रशासनाने याची दखल घेतली नाही. सद्यस्थितीत सोनल प्रकल्पात १०० टक्के पाणी उपलब्ध आहे.परंतू संबंधित प्रशासनाचे नियोजन नसल्यामूळे शेतकऱ्यांवर जमीन पडीक ठेवण्याची वेळ आलेली आहे. हरभरा,गहू पेरण्याची शेतकऱ्यांनी तयारी केलेली आहे.परंतू पाणी उपलब्ध नसल्यामूळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व शेतकऱ्यांना उपसा सिंचन करण्यास परवानगी द्यावी अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी अर्जुन सुर्वे, संतोष राऊत, मारोती पाचे, मारोतराव राऊत, श्रीधर राऊत, रत्नदिप राऊत, गौरव राऊत, नंदूभाऊ येवले, राजकुमार येवले, पवन मुखमाले, गजानन सुर्वे,  संजय मुखमाले, तुळशीराम कस्टे ,हरिदास वाढणकर, शरद सुर्वे, प्रविण सुर्वे, हरिष सुर्वे, मंगेश सुर्वे, घनश्याम सुर्वे, शुभम सुर्वे. यांची उपस्तिथी होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनFarmerशेतकरी