शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

सिंचनासाठी पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्रांचे सोनल प्रकल्पामध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 17:27 IST

शेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आहे.सिंचनासंदर्भात जिल्हाधिकारी मिश्रा यांना निवेदन ही दिले होते. मात्र अद्याप पर्यंत रब्बी पिकांसाठी पाणी सोडले नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोनल प्रकल्पात बसून आंदोलन केले. सोनल प्रकल्पातून शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी सोनल प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या शेतकरी व शेतकरी पुत्रांनी आंदोलना दरम्यान आपली मागणी लावुन धरली.कालव्याची डागडूगी करून  १९ नोव्हेंबर रोजी पाणी सोडावे अन्यथा धरणात बसून आंदोलन करू असा इशारा शेतकरी पुत्रांनी ३० आँक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिला होता. तरीही प्रशासनाने कालव्याची पुर्णपणे डागडूजी करून पाणी सोडले नाही.म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पाण्याअभावी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकापासून आवश्यक तेवढे उत्पन्न मिळाले  नाही. रब्बी हंगामात पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नूकसान होऊ नये यासाठी परिसरातील शेतकरी, शेतकरी पुत्रांनी कालवे दुरूस्त करून मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडावे अशी मागणी केली होती. परंतू प्रशासनाने याची दखल घेतली नाही. सद्यस्थितीत सोनल प्रकल्पात १०० टक्के पाणी उपलब्ध आहे.परंतू संबंधित प्रशासनाचे नियोजन नसल्यामूळे शेतकऱ्यांवर जमीन पडीक ठेवण्याची वेळ आलेली आहे. हरभरा,गहू पेरण्याची शेतकऱ्यांनी तयारी केलेली आहे.परंतू पाणी उपलब्ध नसल्यामूळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व शेतकऱ्यांना उपसा सिंचन करण्यास परवानगी द्यावी अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी अर्जुन सुर्वे, संतोष राऊत, मारोती पाचे, मारोतराव राऊत, श्रीधर राऊत, रत्नदिप राऊत, गौरव राऊत, नंदूभाऊ येवले, राजकुमार येवले, पवन मुखमाले, गजानन सुर्वे,  संजय मुखमाले, तुळशीराम कस्टे ,हरिदास वाढणकर, शरद सुर्वे, प्रविण सुर्वे, हरिष सुर्वे, मंगेश सुर्वे, घनश्याम सुर्वे, शुभम सुर्वे. यांची उपस्तिथी होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनFarmerशेतकरी