शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
6
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
7
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
8
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
9
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
10
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
11
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
12
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
13
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
14
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
15
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
16
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
17
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
18
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
19
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
20
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द

लोकसहभागातून २.४९ कोटी लीटर पाणी साठवण्याची सोय                    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 2:32 PM

जलसंधारणाची विविध कामे केल्यानंतर आता साखरावासियांनी गावातील तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क                           वाशिम : गावाच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाईची समस्या हद्दपार करण्याचा जणू वाशिम जिल्ह्यातील साखरावासियांनी विडाच उचलला आहे. जलसंधारणाची विविध कामे केल्यानंतर आता साखरावासियांनी गावातील तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण केले आहे. यामुळे तब्बल २.४९ कोटी लिटर पाण्याची साठवणूक होणार आहे. शेतकरी, ग्रामस्थांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून ही किमया साधली आहे.आदर्श गाव साखरा येथील जलमित्र तथा ग्रामकार्यकर्ते सुखदेव आत्माराम इंगळे यांनी जलमित्र या नात्याने गावात जलजागृती व जनजागृती केली. त्यांच्या या कार्याचे फलित झाले आणि गावातील बुजत चाललेल्या तलावाचे पुनरुज्जीवन झाले. १० जेसीबी मशीनच्या आधारे या तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला आणि हा गाळ शेतकºयांनी आपल्या शेतात टाकून आपली हलकी जमीन सुपिक बनवली आहे. शेतकरी, ग्रामस्थांच्या श्रमदानासह लोकवर्गणीतून या तलावाचे खोलीकरण करण्यात आल्यानंतर तलावाची लांबी २६० मीटर, रुंदी १२० मीटर आणि खोली ८० मीटर झाली आहे. त्यामुळे या तलावाची पाणी साठवण क्षमता २ कोटी ४९ लाख ६० हजार लीटर झाली आहे.  यामुळे गावातील भुजल पातळीतही वाढ होणार असुन, त्याचा फायदा शेती सिंचनासह गुरा ढोरांना होईल आणि भविष्यात पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही.  ८८२० ब्रास गाळ उपसासाखरा येथे लोक सहभागातून करण्यात आलेले तलाव खोलीकरण जिल्हाभरातील लोकांसाठी आदर्श ठरावे, असेच आहे. या तलावासाठी अवघ्या ७ जेसीबी मशीनच्या आधारे १० दिवसांत तब्बल ८८२० ब्रास खोदकाम करून गाळाचा उपसा करण्यात आला. तर १९ शेतकºयांनी तब्बल ८६९० ट्रॉली गाळ नेऊन आपल्या शेतात टाकला आहे. त्यात गजानन राऊत आणि महादेव राऊत यांनी प्रत्येकी २००० ट्रॉली, भास्कर महाले यांनी ७०२ ट्रॉली, गजानन इंगळे यांनी ५५० ट्रॉली, राजाराम वैद्य यांनी ५०२, विजय अघम यांनी ३९०, मधुकर शिंदें यांनी ३६०, रामराव इंगळे, लक्ष्मण राऊत, भास्कर ठाकरे, सखाराम राऊत यांनी प्रत्येकी ३५०, मारोती इंगळे, रामचंद्र इंगळे यांनी प्रत्येकी १६०, महादेव महाले १५५, पंढरी महाले १५०, तर बंडू धतुडे, शिवाजी शिंदे, श्रीराम महाले यांनी प्रत्येकी १०० ट्रॉली गाळ शेतात नेऊन टाकला आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी